अयोध्या राममंदिराचे प्रकरण सध्या तूफान गाजत असताना, शिवसनेचे नेते आणि खासदार संजय राऊनत यांनी या मुद्द्यावरुन पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ‘१९९२ साली बाबरी मशीद पाडण्यासाठी रामभक्तांना केवळ १७ मिनिटं लागली होती. त्यामुळे आता राम मंदिर बांधण्यासाठी अध्यादेश आणायला जास्त वेळ लागणार नाही’, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचा पार्श्वभूमीवर संजय रावतांनी केलेलं हे वक्तव्य नव्या वादाला तोंड फोडण्याची शक्यता आहे. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, की राष्ट्रपती भवनापासून ते उत्तरप्रदेशच्या विधानसभेत भाजपचीच सत्ता आहे आणि राज्यसभेतील बहुतांश सदस्य हे राम मंदिराच्या बाजून आहेत. राम मंदिर बांधण्याच्या विरोधात जर कुणी असेल तर त्याला या देशात शांततेत राहता येणार नाही, असा उघड उघड धमकीवजा इशाराही त्यांनी यावेळी दिला. बाबरी मशीद प्रकरणातील याचिकाकर्ते मोहम्मद इक्बाल अन्सारी यांनी, राम मंदिर बांधण्याबाबत अध्यादेश आणण्यावर आपला काहीच आक्षेप नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Humne 17 minute mein Babri tod di, to kanoon banane mein kitna time lagta hai?Rashtrapati Bhawan se lekar UP tak BJP ki sarkar hai. Rajya Sabha mein aise bahot sansad hai jo Ram mandir ke saath khade rahenge,jo virodh karega uska desh mai ghumna mushkil hoga:Sanjay Raut,Shiv Sena pic.twitter.com/62zlo0eZJ5
— ANI (@ANI) November 23, 2018