घरदेश-विदेशलालू प्रसाद यादवांच्या सुनेचे गंभीर आरोप, म्हणे 'मला खायला देत नाहीत'!

लालू प्रसाद यादवांच्या सुनेचे गंभीर आरोप, म्हणे ‘मला खायला देत नाहीत’!

Subscribe

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव सध्या चारा घोटाळा प्रकरणी तुरुंगाची हवा खात असताना त्यांच्या घरी मात्र यादवी भडकली आहे. त्यांची सून ऐश्वर्या रॉय हिने तिची सासू राबडी देवी, नणंद मिसा भारती आणि पती तेज प्रताप यादव यांच्यावर अमानुष वागणूक दिल्याचा आरोप केला आहे.

बिहारमध्ये एकीकडे पावसानं थैमान घातलेलं असताना राज्यातलं मोठं राजकीय कुटुंब असलेल्या लालू प्रसाद यादव यांच्या घरात अंतर्गत यादवीनं थैमान गातलं आहे. लालूप्रसाद यादव यांची सून आणि त्यांचा सर्वात मोठा मुलगा तेज प्रताप यादव याची पत्नी अर्थात ऐश्वर्या रॉय ही रविवारी दुपारी भर पावसात घराच्या आवारात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये बसून होती. रात्री उशिरापर्यंत ती तिथेच होती. ‘मला घरात घेतलं जात नाही’, असा आरोप ऐश्वर्यानं पोलिसांशी बोलताना केला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर ऐश्वर्या रॉयला घरात घेतलं गेलं. मात्र, यामुळे यादव कुटुंबातला अंतर्गत कौटुंबिक वाद आता चव्हाट्यावर आला आहे.

‘मिसा भारती माझा छळ करतात’

रविवारी दुपारीच लालू प्रसाद यादव यंच्या पाटणा येथील घराच्या बाहेर पत्र्याच्या शेडमध्ये ऐश्वर्या रॉय यांनी माध्यमांशी संवाद साधला. रात्री उशीरापर्यंत त्या घराबाहेरच होत्या. माध्यमांशी बोलताना त्यांनी तेज प्रताप यादव यांची मोठी बहीण मिसा भारती यांच्यावर छळाचा आरोप केला. ‘गेल्या तीन महिन्यांपासून मिसा भारती यांच्या सांगण्यावरून मला घरी जेवण दिलं जात नाही. माझ्या आई-वडिलांनी पाठवलेल्या जेवणावर मी जिवंत आहे. रविवारी तर मला घराच्या किचनमध्ये येऊच दिलं नाही. त्याचबरोबर घरगड्यासोबत झालेल्या वादामुळे मला घराबाहेर पळून यावं लागलं. मिसा भारती यांनी नेहमीच माझ्याशी गैरवर्तन केलं आहे. माझा छळ केला आहे. शनिवारी रात्री देखील त्यांनी माझा छळ केला आणि मला घराबाहेर काढलं. हे सगळं राबडी देवी यांच्यासमोर सुरू होतं’, असं ऐश्वर्या रॉय म्हणाल्या.

- Advertisement -

तेज प्रताप यादव यांची घटस्फोटाची नोटीस

ऐश्वर्या रॉय यांचे पती तेज प्रताप यादव यांच्यासोबत गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू होते. या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यादव यांनी घटस्फोटासाठी नोटीस देखील पाठवली आहे. मात्र, ‘एकत्र येण्याच्या आशेवर मी अजूनही त्याच घरात राहात होते, मात्र वारंवार माझा छळ केला गेला’, असा आरोप ऐश्वर्या रॉय यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -