करण जौहरचा सुप्रसिद्ध ‘कॉफी विथ करण 7’ कार्यक्रम सध्या अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. मागील अनेक दिवसांपासून या कार्यक्रम सुरू आहे. यामध्ये आत्तापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. यामध्ये कलाकारांच्या आयुष्यातील अनेक मोठे मोठे खुलासे करण्यात आले. इतकचं नव्हे तर करणने या शोमध्ये अभिनेत्री कतरीना कैफ आणि विक्की कौशलच्या लग्नात त्याला आमंत्रण दिलं नसल्याची खंत व्यक्त केली आहे.
करण जौहरला मिळालं नव्हतं कतरीना-विक्कीच्या लग्नाचं आमंत्रण
‘कॉफी विथ करण 7’ मधील शेवटच्या एपिसोडमध्ये दानिश सैत, तन्मण भट्ट, कुशा कपिला आणि निहारिका एनएम यांनी करणला अनेक प्रश्न विचारले. त्यावेळी करणने कतरीना-विक्कीच्या लग्नात आमंत्रण मिळालं नसल्याबाबत खंत व्यक्त केली. त्यावेळी तो म्हणाला की, जेव्हा विक्की आणि कतरिनाचं लग्न होत होतं, ती वेळ माझ्यासाठी खूप लाजीरवाणी होती. त्यावेळी लोक मला म्हणाले की, आम्हाला त्यांच्या लग्नाबाबत तुम्ही सांगितलं नाही. तुम्ही लग्नामध्ये जात आहात आणि अजूनही आम्हाला याबद्दल काहीच माहीत नाही. त्यावेळी ही माझ्यासाठी खूप लाजीरवाणी गोष्ट होती. परंतु खरं सांगायचं तर मला आमंत्रणच मिळालं नव्हतं. परंतु लग्नानंतर मला सहानुभूति देणारे अनेक मॅसेज आले. परत लोकांनी विचारायला सुरूवात केलं की, तुम्हाला आमंत्रण का नाही मिळालं? तुमच्यामध्ये सर्व काही ठिक आहे ना?
कतरीना-विक्कीचं गुपचूप पार पडलं लग्न
कतरीना आणि विक्कीने त्यांच्या लग्नाबाबत कोणालाही काही सांगितले नव्हते. दोघांनी आपल्या कुटुंबीयांच्या आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींच्या उपस्थित लग्न केलं. करण जौहर म्हणाला की, जेव्हा मला समजलं की अनुराग कश्यपला देखील लग्नाचे आमंत्रण देण्यात आले नव्हते, तेव्हा मला थोडं बरं वाटलं”.
हेही वाचा :