घरताज्या घडामोडी'नाना पाटेकर दुसरा आसाराम बापू'

‘नाना पाटेकर दुसरा आसाराम बापू’

Subscribe

'नाना पाटेकर हा दुसरा आसाराम बापू आहे', अशा शब्दांत अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर टीका केली आहे.

‘नाना पाटेकर हा दुसरा आसाराम बापू आहे’, अशा शब्दांत अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर टीका केली आहे. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, तनुश्रीची छेडछाड केल्याचा आरोप नाना पाटेकर यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर भारतात मी टू मोहिमेला सुरुवात झाली. दरम्यान, काही गोष्टींचा खुलासा करण्यासाठी तिने तिच्या वकिलासोबत आज, पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर अनेक आरोप केले आहेत.

मनसेच्या गुंडांना बोलावून सेटवर गोंधळ

- Advertisement -

‘नाना पाटेकर यांचे वकील निलेश पावसकर यांनी सर्व पुरावे नष्ट केले असून त्यांनी २००५ सालापासून नाना पाटेकर यांच्यावरील अनेक लैंगिक शोषणाची प्रकरणे देखील रद्द केली आहेत’, असा खुलासा तनुश्री दत्ताने आजच्या पत्रकार परिषदेमध्ये केला. तसेच नाना पाटेकर यांनी त्यावेळी मनसेच्या गुंडांना बोलावून सेटवर गोंधळ देखील घातला होता. त्यानंतर कोरिओग्राफर गणेश आचार्यने माझे करिअर देखील उध्वस्त केले,’ असा घणाघात तनुश्रीने यावेळी केला.

नाम फाऊंडेशनच्या नावाने भ्रष्टाचार

- Advertisement -

‘नाना पाटेकर यांनी नाम फाऊंडेशनच्या नावावर अनेक भ्रष्टाचार केले आहेत. तसेच या संस्थेच्या नावाखाली परदेशातून कोट्यवधींच्या देणग्या घेतल्या आहेत. त्यामुळे आता हा पैसा जातो तरी कुठे?’ गरिबांना वर्षातून एकदा साड्या वाटायच्या आणि फोटो काढायचे म्हणजे काम झाले. तसेच काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे कोल्हापुरकरांचे प्रचंड नुकसान झाले होते. अनेकांचे संसार उघड्यावर पडले होते. त्यावेळी नाना पाटेकर ५०० पूरग्रस्तांना घरे देणार होते?, त्याचे काय झाले? कोणी जाऊन बघितले का?, असे एक ना अनेक आरोप या पत्रकार परिषदेमध्ये तनुश्रीने नानांवर केले आहेत.


हेही वाचा – Video : सारा अली खान बनली ‘जलपरी’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -