घरमनोरंजनभारती आणि बयो यांच्या आयुष्यात आलेल्या नव्या वळणाचे काय परिणाम होतील?

भारती आणि बयो यांच्या आयुष्यात आलेल्या नव्या वळणाचे काय परिणाम होतील?

Subscribe

मराठी वाहिनी कायमच आशयघन विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. शिक्षणासाठीची जिद्द आणि स्वप्नांची ओढ, असा वेगळा विषय हाताळत ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेली ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ ही मालिका सध्या एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. बायोच्या शिक्षणाच्या जिद्दीचा अनोखा प्रवास या मालिकेत आपल्याला पाहायला मिळत आहे. मालिकेत आता बायो आणि इरा यांच्यातील परीक्षेमधील चुरस सध्या पाहता आली.

आता मालिका एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. भारती आणि शुभंकर यांच्या लग्नानंतर बयो आणि भारती यांच्या आयुष्यात वेगळे वळण आले आहे. त्याचे परिणाम बयो आणि भारती यांना भोगावे लागणार आहेत. भारतीला गावातील लोकांचे बोलणे ऐकावे लागले. तसेच इरा आणि बयो यांचा विज्ञान परीक्षेच्या तयारीतही खंड पडेल का? पण आता शुभंकर म्हणजेच बयोचा काजवा तिच्याबरोबर असल्याने स्वप्नपूर्तीसाठी त्याची मदत होऊ शकते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. शिक्षणाच्या जिद्दीचा हा अनोखा प्रवास बयोचं डॉक्टर होण्याचं स्वप्न कसं पूर्ण करणार, हे पाहण्यासाठी सोनी मराठी वाहिनीवरली ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ ही मालिका नक्की पाहा.

- Advertisement -

 


हेही वाचा :

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती करतेय ‘या’ बिझनेस मॅनला डेट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -