घरफिचर्सकाळजात रुजलेला अंधार

काळजात रुजलेला अंधार

Subscribe

इंट्रो : सतत आनंदी दिसणारी माणसे अनेकदाआतून अदृश्यदु:खाने पोखरलेली असतात.छोट्या-छोट्या गोष्टीत आनंद शोधू पाहणारंत्यांचंमन नैराश्य टाळू शकत नाही.काही माणसांच्या लढाया त्यांच्या मरणापर्यंत संपत नाहीत.कदाचित मरणानंतरही...

गावाकडे प्रचंड लोडशेडिंग असायची. दिवे लागलेले दिसणे ही दुर्मिळ गोष्ट होती. उन्हाळ्यात लोडशेडिंग आणखी वाढायचे.मग उन्हाळ्याचे दिवस अधिक असह्य होऊन जायचे. दुपारी रणरणत्या ऊन्हाने जिवाची लाहीलाही व्हायची.घरासमोरच्या खळ्यातला चारा आपोआप पेटून जाईल की कायअसंवाटायचं. संध्याकाळ होईपर्यंत तिथली गाय चारापाण्यासाठी हंबरायची. विजेच्या तारेवर कधीतरी एखादंचुकार पाखरू दिसायचं. दुपार सहन करून संध्याकाळ होण्याची वाट बघणंमुश्किल व्हायचं.पण नदीकाठच्या बाभळीवर संध्याकाळी बगळे येऊन बसायचे,हे त्यातल्या त्यात बरंहोतं.या अशा अंधारून येणार्‍या संध्याकाळी पुलावर बसून घरी जाणार्‍या बैलगाड्यांचे आवाज ऐकणं हा

कानासकट मनालाहीएक विरंगुळाअसायचा.रात्री जेवण झाल्यानंतर बायाबापडे घरासमोरच्या ओट्यावर गप्पा मारत बसायचे.कधी-कधी थंड हवेची झुळूक यायची, देहमान सुखावून जायचं समाज मंदिराजवळ देवीचंएक छोटंसंदेऊळ होतं. तिथंरोज रात्री आदिवासी मूलंगाणी म्हणायची.त्या शांततेत ती गाणी कानाला फार श्रवणीय वाटायची.त्या गाणार्‍या मुलांमध्ये एक सावळ्या रंगाचा दणकट पोरगा होता. सगळेजणत्याला प्रेमाने ’भोर्‍या’ म्हणायचे.त्याचा आवाज जाडाभरडा तरीही गोड होता. ’तुझ्याविना मला कुणी नाय,अंबाबाय..!’हे गाणंतो नेहमी म्हणायचा. .

- Advertisement -

गावची आठवण आली की,मला नेमकंहेच गाणंआठवतं. मग मिट्ट काळोखात हरवलेल्या बाभळी आठवतात.मिणमिणता दिवा लागलेलंआमचंघर आठवत.ओट्यावर आराम करणारे वडील आठवतात. त्याचे घट्टे पडलेले हात आठवतात.त्यांच्या पायातली कुरूपंआठवतात. सतत काहीतरी मोजणारी त्यांची बोट आठवतात.कधीतरी त्यांचंदचकून झोपेतून उठणंआठवतं.मनाशी बोलत राहणं आठवतं. आयुष्यभर संघर्ष करून, अनेक पराभव सहन करून पुन्हा-पुन्हा जिंकण्यासाठी त्यांच लढणंआठवतं.

सतत आनंदी दिसणारी माणसे अनेकदाआतून अदृश्यदु:खाने पोखरलेली असतात.छोट्या-छोट्या गोष्टीत आनंद शोधू पाहणारंत्यांचंमन नैराश्य टाळू शकत नाही. काही माणसांच्या लढाया त्यांच्या मरणापर्यंत संपत नाहीत. कदाचित मरणानंतरही…कधीतरी सकाळी-सकाळीच”अच्छोको बुरा साबित करना,दुनिया की पुरानी आदत है…’या ओळी गाणारा वडिलांचा प्रसन्न चेहरा आठवतो. आपण वडिलांचा आवाज विसरत जातो,ही किती वाईट गोष्ट आहे. या विस्मरणांचंकाय करायचंअसतं?जेवायला बसल्यानंतर सर्वात प्रथम ज्वारीच्या भाकरीचा एक कोरडा तुकडा मोडून खाणार्‍या वडिलांचे हात अचानक आठवायला लागतात, तेव्हा नेमकंकाय करायचंअसतं?कधीकधी वाटतं,कीहे आठवणीचं मोहळ कुणीतरी उठवलं पाहिजे. किंवा आपली स्मरणशक्ती कुणीतरी हिरावून घेतली पाहिजे. हे मन आणि मेंदू रात्रीच्या काळोखात मिटून का जात नाहीत?जुन्या दिवसांची पाटी कोरी करकरीत का होत नाही? आमच्यात रुजलेला हा अंधार आम्हाला असा उपटून फेकता येणार नाही.हे स्मरणदिवे आमच्या अस्तित्वाची राख होईपर्यंत विझणार नाहीत.
….तोपर्यंत तरी आपण आपल्या अंधारावर प्रेम करणं शिकायल हवं.

- Advertisement -

– अरुण तीनगोटे

(लेखक कवी आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -