गणपती उत्सव आला की गणपती बाप्पाच्या आरत्यांनी परिसर दणाणून निघतो. बाप्पाच्या पारंपारिक आरत्या आणि गाणी आता सगळ्यांचीच तोंडपाठ झाली आहेत. मात्र यावर्षी बाप्पाच्या आरत्या वेगळ्या रूपात ऐकण्याची संधी मिळणार आहे. सरोदवादक उस्ताद अमजद अली खाँ यांचे पुत्र अमान अली बंगाश आणि अयान अली बंगाश यांनी नुकतंच गणपती बाप्पाच्या आगमनाचे औचित्य साधून सरोद वाद्याद्वारे गणपतीच्या आरत्या संगीतबद्ध केल्या आहेत. ‘जय गणेश जय गणेश देवा… आणि सुखकर्ता दुःखहर्ता…’ या दोन आरत्यांचे सुरमधुर व मनोवेधक असे सरोद इंस्ट्रूमेंटल हे व्हर्जन आहे.
गणपती हे आपलं आराध्य दैवत आहे. गणपती आरत्यांमधील एक साधेपणा, सादगी आणि प्रेरणा मनाला भावणारी असते. हीच भावना सरोद वाद्याद्वारे टिपायचा एक छोटासा प्रयत्न आम्ही या गणपती आरतीच्या सरोद इंस्ट्रूमेंटल व्हर्जनद्वारे केलेला आहे. जय गणेश… पासून सुरुवात करत सुखकर्ता आणि सुंदर अशा गणेश पुराणाचा उपयोग करून पखवाज काम्पोजिशनद्वारे हा ट्रॅक संगीतबद्ध करण्यात आलेला आहे. या संगीतामुळे गणेशोत्सवाप्रसंगी सर्वांना शांतता, सौख्य व समृद्धीची प्रेरणा मिळो हीच देवचारणी प्रार्थना. – अयान अली बंगाश, संगीतकार
आधीपासूनच सुप्रसिद्ध व लोकप्रिय असणार्या या आरत्यांना पुन्हा संगीतबद्ध करणे आणि तेही सरोद वाद्याद्वारे हे एक प्रकारचे आव्हानच अमान आणि अयान यांनी स्वीकारलं होतं.
सरोद वाद्याद्वारे या आरत्यांची पुनरावृत्ती करण्याची संधी आम्हाला मिळाली याबद्दल आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. आरत्यांचा हा ट्रॅक वेदांप्रमाणेच दैवीय मार्गाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे मला अशी आशा आहे की, हे संगीत देखील प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्शून जाईल. – अली बंगाश, संगीतकार
बाजी’ मालिकेतील शेरा रूप बदलून पुण्यात दाखल
मुंबई । ‘बाजी’ मालिकेतला बहुरूपी खलनायक शेरा हा त्याचं दुसरं रूप घेऊन पुण्यात परत शिरला आहे. तो आता कुबेरासारख्या श्रीमंत हिरे व्यापार्याचं सोंग घेऊन परत आला आहे. मराठी साम्राज्याला डंख मारण्यासाठी शेराने पुण्यात शिरकाव केला आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘बाजी’ मालिकेत शेराच्या खेळीमुळे नवीन ट्विस्ट येणार आहे. पेशवाईच्या कालखंडाच्या पार्श्वभूमीवरच्या या मालिकेतील खलनायक सध्या चर्चेत आहे. म्हातारा बनून वेगवेगळी कट कारस्थानं रचून पेशवाईत हैदोस घालण्याच्या उद्देशाने तो या ठिकाणी शिरला होता. पुण्याच्या कोतवालीतला प्रामाणिक शिलेदार बाजी यानं त्याला मारलं. पण तो खरच मेला आहे की जिवंत आहे, हे एक रहस्य कायम आहे. त्याचा मृत्यू झाला नसेल तर नेमकं त्याने काय घडवून आणलं, याचीही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. ऐतिहासिक घटनांचे संदर्भ घेत लिहिली गेलेली ‘बाजी’ ही एक रहस्य कथा असून निजामाच्या कारस्थानाचा भाग म्हणून शेरा पेशवाई खिळखिळी करण्यासाठी शेरा पुण्यात आला आहे. शेराच्या या नवीन रुपामुळे मालिकेत रंजन वळण आले आहे.