ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्याचे प्रत्येक महिन्यात राशीपरिवर्तन होते. सध्या सूर्य मीन राशीत असून तो 14 एप्रिलला तो मेष राशीत प्रवेश करणार आहे. 15 मे पर्यंत सूर्य मेष राशीत राहील. त्याच वेळी, राहू आधीपासून मेष राशीत आहे. सूर्याच्या संक्रमणामुळे मेष राशीमध्ये सूर्य आणि राहूचा संयोग होईल, ज्यामुळे ग्रहण होईल. ग्रहण योग ज्योतिष शास्त्रात अशुभ मानला जातो. या अशुभ योगाचा प्रभाव सर्व 12 राशींवर पाहायला मिळेल. तर एकीकडे शनीची तिसरी दृष्टी सूर्यावर असेल. सूर्य आणि शनि हे शत्रू ग्रह आहेत. यामुळे 20 एप्रिल ते 28 एप्रिल हा काळ 4 राशीच्या लोकांसाठी विशेषतः कठीण असणार आहे.
4 ‘या’ राशींसाठी अशुभ असणार ग्रहण योग
- वृषभ
सूर्य आणि राहू युतीमुळे तयार होत असलेल्या या ग्रहण योगाचा वृषभ राशीच्या व्यक्तींवर नकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. तुमच्या खोटे आरोप लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावध राहा. आईच्या आरोग्याची काळजी घ्या.
- कन्या
ग्रहण योगामुळे कन्या राशींच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती बिघडू शकते. आरोग्याची काळजी घ्या. वैवाहिक जीवनात वाद संभावतात.
- वृश्चिक
सूर्य आणि राहू युतीमुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शत्रूंपासून त्रास संभावतो. आरोग्यकडे लक्ष द्या. कामात अडथळे निर्माण होऊ शकतात. अज्ञात भीती वाटेल.
- कुंभ
सूर्य आणि राहू युतीमुळे कुंभ राशीच्या व्यक्तींना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. व्यवहार करताना किंवा पैसे उधार देताना काळजी घ्यावी. वैवाहिक जीवनात कलह निर्माण होतील. दूरचा प्रवास टाळा.
हेही वाचा :