घरताज्या घडामोडीराज्यात १८ हजार ठिकाणी मिळणार १० रुपयाची थाळी

राज्यात १८ हजार ठिकाणी मिळणार १० रुपयाची थाळी

Subscribe

शिवसेनेच्या बहुचर्चित १० रुपयांच्या थाळीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून आता राज्यात १८ हजार ठिकाणी १० रुपयाची थाळी मिळणार आहे.

शिवसेनेच्या बहुचर्चित १० रुपयांच्या थाळीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या निर्णयाल मंत्रीमंडळात मंजुरी मिळाल्यानंतर यासंदर्भातील शासन निर्णय गुरुवारी जाहीर करण्यात आला असून या निर्णयानुसार राज्यात प्रत्येक जिल्हयात आता १० रुपयांची थाली मिळणारे शिवभोजन योजनेचे केंद्र असणार आहे. या निर्णयानुसार राज्यात सुमारे १८ हजार केंद्र उभारण्यात येणार आहेत. ज्यात प्रामुख्याने मुंबईत शहरात ४५० आणि उपनगरात १५०० असे एकूण मिळून १९५० केंद्र असणार आहेत. त्यापाठोपाठ पुण्यात १५०० आणि ठाण्यात १३५० केंद्र असणार असल्याचे या निर्णयात जाहीर करण्यात आले आहेत. तर या निर्णयासाठी तीन महिन्यांसाठी साधारण ६ कोटी ४८ लाख इतका अपेक्षित असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, हा निर्णय जाहीर करताना अनेक अटी आणि शर्ती ठेवल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे.

शिवभोजन संदर्भातील जीआर जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात १० रुपयांत थाळी देण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आल्यानंतर किमान समान कार्यक्रमात देखील या घोषणेचा पुर्नउचार करण्यात आला होता. त्यामुळे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष्य या भूमिकेकडे लागून राहिले होते. या निर्णयाला काही दिवसांपूर्वीच मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. अखेर गुरुवारी या निर्णयासंदर्भात शासन निर्णय जाहीर करीत या निर्णयाला हिरवा कंदील दर्शविण्यात आला आहे.

- Advertisement -

या निर्णयानुसार भोजनालय चालविण्यासाठी सद्यस्थितीत सुरु असलेले खानावळ, एनजीओ, महिला बचातगट, भोजनालय, रेस्टॅरंट अथवा मेस यापैकी ही योजना चालविण्यासाठी सक्षम असलेल्यांना यासाठी संधी दिल्या जाणार आहेत. वरील संस्थेची निवड करण्याकरिता महानगरपालिका, मुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्र, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरावर समिती गठित करण्यात येणार आहे. ही समिती यासाठी संस्थेची निवड करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे. तर या योजनेत देण्यात येणाऱ्या थाळीची किंमत शहरी भागात ५०, ग्रामीण भागांत ३५ इतकी राहणार असून यासाठी प्रतिग्राहकांकडून १० रुपये आकारण्यात येणार असून उर्वारित रक्कम अनुदानाच्या स्वरुपात देण्यात येणार आहे.

प्रत्येक केंद्रावर फक्त १५० थाळी मिळणार

राज्य सरकारने जाहीर केलेल्या जीआरनुसार दुपारी १२ ते २ वेळेतच या योजनेला लाभ मिळणर आहे. तर यावेळी भोजनालयात किमान ७५ आणि कमाल १५० थाळी उपल्बध करुन देण्याचे आदेश देण्यात येणार आहे. तर ज्या ठिकाणी ही योजना राबविण्यात येणार आहे, तेथील कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात जेवण देण्याची सक्ती यावेळी करण्यात आली आहे.

- Advertisement -

जेवणात काय काय मिळणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -