घरताज्या घडामोडीमुंबईतील विहिरींतून ८० कोटीचे पाणी चोरणाऱ्यांवर कारवाई करा, आशिष शेलारांची पालिका आयुक्तांकडे...

मुंबईतील विहिरींतून ८० कोटीचे पाणी चोरणाऱ्यांवर कारवाई करा, आशिष शेलारांची पालिका आयुक्तांकडे मागणी

Subscribe

मुंबईतील जलस्त्रोतातून सुमारे ८० कोटींची पाणी चोरी झाली असून टँकर माफिया फोफावले असल्याचे भाजप आमदार आशिष शेलार यांनी सांगितले. तसेच या टँकर माफियांवर कारवा करण्याची मागणी शेलारांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांना केली आहे. शेलारांनी पत्र लिहून महानगरपालिका आयुक्तांनी एसआयटीमार्फत कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुंबईत २५१ अवैध जलविहिरी आहेत. पाणी उपसावर कोणत्याही कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात येत नसल्यामुळे पाणी चोरी करणाऱ्यांवर प्रशासनाचा वचक नाही असे आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

भाजप आमदार आशिष शेलार यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, मुंबई शहरात 19,000 पेक्षा जास्त पाण्याच्या विहिरी आहेत. ज्यापैकी 12,500 बोअरवेल आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने 25 जलकुंभांना नोटिसा बजावल्या असून त्यापैकी 251 अवैध जलविहिरी असून यातील एकाच जलकुंभातून 80 कोटी रुपयांची पाणीचोरी झाल्याचेही बाब समोर आली आहे. यावर कोणतेही नियमन किंवा कायद्याची कडक अंमलबजावणी होत नसल्यामुळे अवैध पाणी टँकर माफियांचे फावले असून मुंबई विभागात 3,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पाण्याची लूट करत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

त्यामुळे मुंबईतील बेकायदेशीर व अनियंत्रित पाणी चोरीचा तपास करून त्यांना दंड आकारून ही चोरी थांबवणे आवश्यक आहे. मुंबईच्या विद्यमान भूजल संसाधनाच्या वापराची क्षमता लक्षात घेऊन वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करून पाणी वापराचे धोरण निर्धारित करणे अत्यावश्यक आहे. म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगर प्रदेशातील अन्य नगरपालिकांच्या समन्वयाने त्वरित याबाबत एक एसआयटी कमिटी गठीत करण्यात यावी अशी विनंती मी या निमित्ताने करतो आहे. या एसआयटीने बाबींचा विचार करणे आवश्यक आहे.

- Advertisement -

टँकर माफियांवर एसआयटीमार्फत चौकशी करा

एसआयटी मार्फत तपास करुन मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात वापरात असलेल्या 19,000 हून अधिक विहिरींमधून प्रत्येकी किती प्रमाणात बेकायदेशीर पाणी उपसा सध्या होत आहे व तो किती असायला हवा.

ज्यांनी कोणत्याही परवानगी किंवा नियमांशिवाय भूजलाचा अतिरीक्त शोषण करीत पाणी उपसा केला आहे. या प्रकरणी दोषी आढळतील अशांवर तातडीने एफआयआर दाखल करुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाची विद्यमान भूजल क्षमता याचा अभ्यास करुन पाणी उपसा किती प्रमाणात झाला पाहिजे याचे धोरण निश्चित करण्यात यावे.

तसेच मुंबई आणि मुंबई महानगरातील मैदाने, बागा यांसाठी लागणारे पाणी याची आवश्यकता लक्षात घेऊन आवश्यक असणारे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून सर्व महापालिकांनी स्वतःचे जलसंचयन धोरण ठरवून ते कार्यान्‍वयीत करण्याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.


हेही वाचा :  सोसायट्यांना बजावलेल्या NA टॅक्स नोटिसींना स्थगिती द्या, आशिष शेलारांचं ठाकरे सरकारला पत्र

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -