घरदेश-विदेशभारत जोडो यात्रा : 18 नोव्हेंबरला महाराष्ट्रात राहुल गांधींची सभा; काँग्रेसकडून जय्यत तयारी

भारत जोडो यात्रा : 18 नोव्हेंबरला महाराष्ट्रात राहुल गांधींची सभा; काँग्रेसकडून जय्यत तयारी

Subscribe

राहुल गांधी यांची पदयात्रा तीन दिवस बुलढाणा जिल्ह्यात असणार आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi)यांची काश्मीर तर कन्याकुमारी ही भारत जोडो पदयात्रा (bharat jodo yatra) सुरु आहे. 2024 च्या निवडणुकांची तयारी आणि देशात काँग्रेसची पाळंमुळं घट्ट कारण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान राहुल गांधी यांची ही पदयात्रा आता महाराष्ट्रात दाखल होणार आहे. 18 नोव्हेंबर रोजी राहुल गांधींची हि यात्रा बुलढाणा (buldhana) जिल्ह्यातील शेगाव येथे येणार आहे. याच दिवशी सायंकाळी राहुल गांधी यांची जंगी सभासुद्धा होणार आहे. राहुल गांधींच्या या सभेची आणि यात्रेची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले(nana patole) यांच्या सोबत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, चंद्रकांत हंडोरे, यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेसचे मोठे नेते शेगाव येथे तयारी करताना दिसून येत आहेत.

राहुल गांधी यांची पदयात्रा तीन दिवस बुलढाणा जिल्ह्यात असणार आहे. त्यामुळे सभेचे नियोजन कारण्यासाठी आणि सभास्थळाची पाहणी कारण्यासाठी काँग्रेच्या या नेत्यांची शेगावमध्ये लगबग दिसत आहे. दरम्यान राहुल गांधी यांच्या सभेसाठी सहा लाख लोकं येणार असून त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. काँग्रेसकडून राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची (bharat jodo yatra) जय्यत तयारी करण्यात येत आहे.दरम्यान राहुल गांधी भारत जोडो यात्रेमधून बेरोजगारी आणि ढासळलेली अर्थव्यवस्था या मुद्यांवरून भाजपवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.

- Advertisement -

दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची नोंद जागतिक पातळीवर घेतली जाईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्या स्वागतच्या नियोजनासाठी प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 7 सप्टेंअबर रोजी कन्याकुमारी (kanyakumari) येथून सुरु झाली होती. तर जम्मू काश्मीरमध्ये (jammu – kashmir) या यात्रेची सांगता होईल. एकूण 3,500 किमीचा प्रवास करून 12 राज्यांमधून ही यात्रा जाणार आहे. महाराष्ट्रात आगमन झाल्यानंतर त्यांच्या भोजन आणि न्याहारीसाठी मराठवाडा आणि खान्देशातील पाककृतींवर भर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या यात्रेत जनतेने जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे यासाठी काँग्रेस कडून आवाहन करण्यात येत आहे.


हे ही वाचा – यांचा कोणता राम खरा? रामरहिमच्या पॅरोलवरून ‘सामना’तून भाजपावर हल्लाबोल

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -