घरताज्या घडामोडीमहासंचालक संजय पांडेंची रजा 'या' चौघातली गोष्ट

महासंचालक संजय पांडेंची रजा ‘या’ चौघातली गोष्ट

Subscribe

राज्यात आलेल्या ‘तौत्के’ चक्रीवादळासोबत सोमवारी सकाळी पोलीस दलात वादळ घोंगावत होते. राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे हे अचानक सुट्टीवर गेल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगत होती. मात्र, स्वतः संजय पांडे यांनी ‘मी चंदीगडला कुटुंबाला भेटण्यासाठी दोन दिवसांची सुट्टी घेऊन आलो आहे आणि याबाबत गृहमंत्री, मुख्य सचिव आणि अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांना अगोदरच रजेबाबतची विनंती केली होती’, असे सांगितल्याने पांडेंची सुट्टी प्रकरण चहाच्या पेल्यातील वादळाप्रमाणे शांत झाले. संजय पांडे यांनी रजेबाबत मुख्यमंत्र्यांना सांगितले नाही. तसेच मुंबईवर संकट असताना त्यांनी शहर सोडल्याने त्यांच्या रजेच्या अर्जावर एकच चर्चा रंगली होती. पण संजय पांडे यांच्या रजेच्या अर्जाच्या निमित्ताने आता माहिती समोर आली आहे.

शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांने सोडली पूडी

राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर पोलीस निरीक्षक अनुप डांगे आणि भीमराव घाडगे यांनी लावण्यात आलेल्या आरोप प्रकरणाची चौकशी त्यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र, परमबीर सिंह यांनी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचे कॉल रेकॉर्डिंग करून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर मात्र संजय पांडे यांनी परमबीर सिंह याची चौकशी करण्यास असमर्थता दाखवली होती. त्याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून तसे कळवलेही होते. त्यावेळीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याच्या वावड्या उठवल्या होत्या. सोमवारी सुद्धा ते दोन दिवस रजेवर गेल्याने शिवसेनेच्या एका ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याकडून आणि एका नेत्याकडून पांडे न सांगता रजेवर गेल्याची माहीती काही निवडक प्रसारमाध्यमांना देण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही काहीजण हेतूपुरस्करपणे पांडेविरोधात चुकीची माहिती पसरवत असल्याबद्दल लक्षात आले आहे, असे खात्रीलायकरित्या समजते.

- Advertisement -

या तिघांना रजेबाबत होती कल्पना

याबाबत दोन दिवसांपूर्वीच पांडे यांनी अतिरिक्त मुख्य सचिव (गृह), मुख्य सचिव आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दोन दिवसांच्या सुट्टीवर जाण्याबाबत चर्चा केली होती. त्यांना सुट्टीवर जाण्याची परवानगी देखील वरिष्ठांकडून दिली गेली. मात्र, त्यांना रविवारपर्यंत थांबण्यास सांगण्यात आले होते. रविवारी बैठका आटोपून पांडे हे सायंकाळी विमानाने चंदीगड येथे दाखल झाले.चंदीगड येथे पांडे यांच्या पत्नी राहत असून त्यांचा मुलगा अमेरिकेत राहण्यास आहे. पत्नीची तब्येत बरी नसल्यामुळे पांडे यांना पत्नीला भेटण्यासाठी तात्काळ चंदीगडला जावे लागले. पांडे सोमवारी पुन्हा मुंबईला येणार होते. मात्र, चक्रीवादळामुळे मुंबईत येणार्‍या सर्व विमानसेवा बंद असल्यामुळे त्यांना सोमवारी दुपारी येणे शक्य झाले नाही. मात्र मंगळवारी सकाळी ते मुंबईत परतले.

काय आहे महासंचालकांची बाजू

माझ्या नाराजीचा प्रश्नच नाही माझ्या नाराजीचा प्रश्नच येत नाही. कुटुंबाला भेटण्यासाठी चंदीगड येथे जाण्याचे अगोदरच ठरले होते. तसे संबंधिताना आणि वरिष्ठांना कळवले होते. माझ्याविषयी वावड्या का उठवल्या जात आहेत, याचे मलाच आश्चर्य वाटते, याकडे संजय पांडे यांनी लक्ष वेधले. आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -