घरमहाराष्ट्रभीती वाटते!

भीती वाटते!

Subscribe

मोदी काय करतील माहित नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत माझे बोट धरून राजकारणात आलो असे सांगतात. परंतु, मला भयंकर काळजी वाटू लागली आहे की, हा माणूस काय करेल माहीत नाही? अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. बारामती मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी दौंड येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत येवून गेले, त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री फडणवीस येवून गेले आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सुद्धा येणार आहेत. आम्ही काय साधे-सुधे नाही आहोत, म्हणूनच हे लोक इथे येत असल्याची मिश्किल टिप्पणी यावेळी पवार यांनी सभेत केली.

मोदींनी राज्यात ७ सभा घेतल्या. त्या सभांमध्ये विषय फक्त शरद पवार हाच होता. मी शेतीच्या प्रश्नात राजकारण करत नाही, असे सांगतानाच आज देशात आणि राज्यात असलेल्या सरकारने चांगली कारखानदारी करणारी शक्ती उभी केली नाही, असा आरोपही शरद पवार यांनी केला. या जाहीर सभेत दौंडचे राहुल कुल यांच्या डबघाईला आलेल्या कारखान्याबाबत आणि त्यांनी मजुरांचे आणि स्थानिक ऊस उत्पादकांची थकवलेली कर्जे यावर भाष्य करताना ऊस उत्पादकांचे वाटोळे करु नका, असा सल्लाही पवारांनी दिला. आम्ही ७० वर्षांत काय केले, असे मोदी विचारत आहेत. परंतु, त्यातील दहा वर्षे तुम्ही काय केले हे सांगा, असा प्रतिप्रश्न पवारांनी विचारला.

- Advertisement -

महाराष्ट्रातील महत्वाचा आणि लक्षवेधी लोकसभा मतदारसंघ असलेल्या बारामती मतदार संघावर केवळ राज्याचेच नव्हे तर देशभराचे लक्ष लागले आहे.राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या मतदारसंघात उमेदवार असल्याने भाजपने आपल्या विजयासाठी कंबर कसली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -