उन्हाळा असह्य झाला आहे. त्यातच कोकणासह मुंबई ठाण्यात उष्णतेची लाट आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आण विदर्भाचा पारा यापूर्वीच वाढला आहेय. त्यामुळे यापासून स्वत:चा आणि कुटुंबाचा कसा बचाव करावा, यासाठी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. या सूचनेत काय करावे आणि काय करू नये, हे स्पष्ट केले आहे.
हे आवर्जून करा
- तहान लागलेली नसली तरी प्रत्येकाने दर अर्धा तासाने पाणी प्यावे
- दुपारी १२ ते ३ दरम्यान घराबाहेर पडू नये
- घराबाहेर पडण्याची गरज असेल तर डोक्यावर टोपी वापरावी किंवा छत्रीचा वापर करावा
- कडक सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी पडदे आणि झडपांचा वापर करावा
- सुती, हलके आणि पातळ कपडे वापरावेत
- प्रवास करत असाल तर सोबत पाण्याची बाटली बाळगा
- उन्हात काम करत असाल तर डोक्यात टोपी घाला, ओल्या कपड्याने डोके, मान
आणि चेहरा झाकावा - शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, लिंबू-पाणी, ताक, घरी बनवलेली लस्सी, कैरीचे पन्हे याचं सेवन करा
- अशक्तपणा, डोकेदुखी, सतत घाम येत असेल किंवा चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
- गुरांना छावणीत ठेवावे आणि त्यांना पुरेसे पाणी द्यावे
- घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर आणि सनशेडचा वापर करावा तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात
- कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी
- सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचना द्याव्यात
- सकाळी लवकरात लवकर कामे करून घ्या
- गर्भवती तसेच आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी
या बाबी टाळा
- उन्हात अतिकष्टाची कामे करू नयेत.
- दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेयांचे सेवन टाळावे
- दुपारी १२ ते ३ या वेळेत बाहेर जाणे टाळावे
- उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नये
- लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या आणि पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये
- गडद घट्ट आणि जाड कपडे घालू नयेत
- उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करणे टाळावे
- मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्यात
या सूचनांचं पालन केल्यास आपला उष्णतेच्या लाटेपासून बचाव होईल आणि कुटुंबही सुरक्षित राहील.