घरताज्या घडामोडीसंजय राऊतांचा जामीन रद्द होणार का? उच्च न्यायालयात आज सुनावणी

संजय राऊतांचा जामीन रद्द होणार का? उच्च न्यायालयात आज सुनावणी

Subscribe

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. संजय राऊतांच्या जामीनावर स्थगिती आणण्याची याचिका ईडीने (ED) उच्च न्यायालयात दाखल केली होती.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. संजय राऊतांच्या जामीनावर स्थगिती आणण्याची याचिका ईडीने (ED) उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. (high court hearing today on ed plea for stay on sanjay raut bail)

संजय राऊतांच्या सुटकेनंतर ईडीने न्यायालयात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याकरता संधी देण्याचाही युक्तिवाद ईडीच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सुनावणीवेळी ईडीच्या युक्तीवादावर न्यायालय काय निर्णय देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांना करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत पीएमएलए न्यायालयाने ईडीला झापले. शिवाय, दिवाणी खटल्यासाठी पीएमएलए कायदा लागू केला असल्याचे ताशेरे कोर्टाने ओढले आहेत.

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा जामीन अर्ज पीएमएलए कोर्टाने मंजूर केला. तब्बल 102 दिवसानंतर संजय राऊतांची तुरूंगातून सुटका झाली. त्यांच्या सुटकेनंतर कार्यकर्ते आणि समर्थकांकडून न्यायालयाच्या परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. राऊत तरुंगातून बाहेर आल्यावर त्यांच्या स्वागतासाठी हजारो शिवसैनिक गर्दी केली होती.

- Advertisement -

याशिवाय, संजय राऊत यांच्या जामीन प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान पीएमएलए न्यायालयाने ईडीला झापले. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, पत्राचाळ प्रकरणी दोन्ही आरोपींना बेकायदेशीररीत्या अटक करण्यात आल्याचे सांगितले. दिवाणी खटले हे मनी लॉन्डरिंग किंवा आर्थिक गुन्हे अशा नावाखाली आणून निर्दोष लोकांना त्यात ओढून त्यांना अटक करून अशा परिस्थितीत आणणे हे न्यायालय मान्य करू शकत नाही. प्रवीण राऊत यांना फक्त दिवाणी खटल्यात अटक करण्यात आली तर संजय राऊत यांना काहीही कारण नसताना अटक केली गेली. या प्रकरणी राकेश आणि सारंग वाधवान मुख्य आरोपी असताना त्यांना अटक करण्याऐवजी संजय राऊत आणि प्रविण राऊत यांना अटक करण्यात आली. यात ईडीच्या बाजूने आरोपी पिक अँड चूज केल्याचे दिसतेय. जर न्यायालयाने इडी आणि म्हाडाचे म्हणणे मान्य केले तर मर्जीने आरोपी निवडण्याच्या पद्धतीला मान्यता दिल्यासारखे होईल. सामान्य लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडेल.


हेही वाचा – रायगडमध्ये आढळला तरंगता बॉम्ब; पोलीस तपासात डमी असल्याचे निष्पन्न

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -