घरताज्या घडामोडीHingoli Accident : दोन मालमोटारीच्या धडकेत ५ जणांसह १९० मेंढ्यांचा जागीच मृत्यू

Hingoli Accident : दोन मालमोटारीच्या धडकेत ५ जणांसह १९० मेंढ्यांचा जागीच मृत्यू

Subscribe

दोन मालमोटारीच्या धडकेत पाच जणांसह १९० मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीपासून काही अंतरावर असलेल्या माळेगावजवळ एक भीषण अपघात झाला.

दोन मालमोटारीच्या धडकेत पाच जणांसह १९० मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीपासून काही अंतरावर असलेल्या माळेगावजवळ एक भीषण अपघात झाला. या अपघातात मेंढ्या घेऊन जाणाऱ्या मालमोटारीने उभ्या असलेल्या फरशीने भरलेल्या मालमोटरीला समोरून जबर धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. (Major Accident Many Sheep And People Died On The Spot In Hingoli)

सलमान अली मौला अली, सत्यनारायण बळाई, लालू मीना, कदीर मेवाती, आलम अली अशी या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. यामधील एकजण राजस्थानमधील, तर इतर चौघे मध्य प्रदेशातील असल्याचे समजते. तसेच, दोन जण गंभीर जखमी असल्याचेही माहिती मिळते. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.

- Advertisement -

नेमका अपघात कसा झाला?

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानातील एक मालमोटर (एचआर-५५-एजे-३१११ ) २०० हूनअधिक मेंढ्या भरून हैदराबादच्या दिशेने जात होता. या मालमोटर चालकासह चौघेजण केबिनमध्ये बसले होते. एक व्यक्ती पाठीमागे मेंढ्यांसोबत बसला होता. हैदराबादच्या दिशेने जात असताना ही माल मोटर गुरुवारी (२५ मे) पहाटे 3 ते 3:30 वाजताच्या सुमारास माळेगाव फाट्याजवळ आली. त्यावेळी उड्डाणपुलाजवळ माल मोटरचालकाला डूलकी लागली. त्यामुळे त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि समोर उभे असलेल्या मालमोटरवर मेंढ्यांनी भरलेली माल मोटार आदळली.

- Advertisement -

या अपघातामध्ये मालमोटरीतील तीन जण जागीच ठार झाली. तर गंभीर जखमी झालेल्या दोघांना उपचारांसाठी नांदेडमध्ये नेत असताना प्रवासामध्येच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात १९० मेंढ्या मृत पावल्या. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कळमनुरी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यानंतर पोलिसांनी अपघातातील दोन्ही जखमींना उपचारासाठी तात्काळ कळमनुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलवले. मात्र रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. दरम्यान, अपघातामध्ये जागीच ठार झालेल्या तिघांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमनुरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. अपघातातील एका जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – HSC Result : बारावीच्या निकालात पुन्हा कोकण विभाग अव्वल, सर्वाधिक कमी निकाल मुंबई विभागाचा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -