घरमहाराष्ट्रनागपूरमी कधीही मंत्रिपद मागितले नाही; मी नाराजही नाही, आमदार रवी राणांनी केले...

मी कधीही मंत्रिपद मागितले नाही; मी नाराजही नाही, आमदार रवी राणांनी केले स्पष्ट

Subscribe

मी कधीही मंत्रिपद मागितले नाही; मी नाराजही नाही, असे आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस योग्य वेळी योग्य व्यक्तीची निवड मंत्री आणि पालकमंत्री म्हणून करतील, असे ते म्हणाले.

अमरावती –शिंदे- फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार काही दिवसापूर्वी झाला. या मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिपद न मिळाल्याने अपक्ष आमदार रवी राणा नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस अमरावतीमधून योग्य व्यक्तीची निवड करतील, असा विश्वास आमदार रवी राणा यांनी व्यक्त केला. ते एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना हे वक्तव्य केले.

रवी राणा काय म्हणाले –

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे ऑनलाईन सरकार चालवले. मात्र, आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने मजबूत सरकार आले आहे. मी कधीही मंत्रिपद मागितले नाही आणि मी नाराजही नाही. कुठल्याही अपक्ष आमदाराने नाराज व्हायची गरज नाही. देवेंद्र फडणवीस यांना अमरावती जिल्ह्याची जाण आहे. ते योग्य वेळी योग्य व्यक्तीची निवड अमरावतीमधून मंत्री आणि पालकमंत्री म्हणून करतील, असे आमदार रवी राणा म्हणाले.

अखेर मंत्रिमंडळ विस्तार 

- Advertisement -

40 दिवसांपासून रखडलेला शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी 9 ऑगस्टला पार पडला. राजभवनातील दरबार हॉलमध्ये एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाचे 9 तर भाजपकडून 9 जणांचा शपथविधी पार पडला. या सर्व आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -