घरमहाराष्ट्रनाशिकबर्फ नव्हे,हा तर गोदावरीचा फेस

बर्फ नव्हे,हा तर गोदावरीचा फेस

Subscribe

एकलहरे ते ओढा दरम्यान रस्ता गोदावरी नदीतील प्रदूषण मुळे स बंद झाल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल

गोदावरी नदीतील प्रदूषणामुळे एकलहरे ते ओढा दरम्यानचा रस्ता सकाळच्या वेळेत बंद होत असल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. रस्त्यावर सांडपाण्याचा फेस जमा झाल्याने वाहतुक ठप्प होते.हे चित्र बघून रस्ताच प्रदूषणात हरवल्याची चर्चा नागरिकांत होती.एकलहरे ते ओढा दरम्यान मोठया पुलाचे काम युद्ध पातळीवर चालू असल्याने तात्पुरत्या स्वरूपात गोदावरीच्या पात्रातून रस्ता तयार करण्यात आला आहे.याच पर्यायी रस्त्याचा वापर एकलहरे ,ओढा,शिलापूर, हिंगणवेढे,कोटमगाव ,सामनगाव येथील नागरिक करतात. मात्र या रस्त्यात मोठ्या प्रमाणात फेस जमा होत असल्याने नागरिकांची पंचायत होते.गंभीर बाब म्हणजे या प्रदूषणयुक्त पाण्याचा नागरी आरोग्य, जलचर प्राणी यांसह शेतीवरही विघातक परिणाम होत आहे. या संदर्भातील ‘आपलं महानगर’चा हा विशेष वृत्तांत.

प्रवाहित पाण्यात ‘बीओडी’चे प्रमाण कमीच

बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांडची (बीओडी) पातळी नव्या निकषांप्रमाणे १० च्या आत असणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रदूषण नियंत्रण महामंडळाने वर्षभर केलेल्या पाहणीत ही पातळी १० च्या आत असल्याचे निदर्शनास येते. मात्र, महामंडळाच्या वतीने नेहमी प्रवाहित पाण्याचीच तपासणी केली जाते. प्रत्यक्षात नदी केवळ पाच ते सहा महिने प्रवाहित असते. उर्वरित कालावधीत तिच्यात डबके साचतात. त्या पाण्यातील बीओडीची पातळी कितीतरी अधिक असते. खासगी संस्थेने केलेल्या पाण्याचा तपासण्यांत नदीपात्रातील बीओडीची पातळी ही २० पेक्षा अधिक आढळते.

- Advertisement -

डिटर्जंटच्या घटकांमुळेच फेसाळते नदी

उंचावरुन पाणी आदळल्याने फेस तयार होतो. त्यामुळे महापालिकेने पाणी उंचावरुन आदळू नये अशी यंत्रणा तपोवन परिसरात तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र तरीही फेस तयार होत आहे. हा फेस तयार होऊ नये म्हणून नदीपात्रात सोफ किंवा डिटर्जंटचे घटक मिसळूच नये याची काळजी घेणे गरजेचे असताना महापालिका प्रशासन मात्र अनावश्यक बाबींकडेच अधिक गांभीर्याने लक्ष देत आहे.

बीओडी म्हणजे काय?

बायो ऑक्सिजन डिझॉल्व्ह्ड (बीओडी) म्हणजे पाण्याची गुणवत्ता मोजण्याचा महत्वाचा निकष ठरतो. बीओडी म्हणजे पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण. ते प्रति लीटर मिली ग्रॅममध्ये मोजतात. सूक्ष्म जलचर पाण्यात विरघळलेल्या स्वरुपातील ऑक्सिजनचा वापर करत असतात. कमी प्रमाणातील बीओडी म्हणजे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी, असा निष्कर्ष काढता येतो.

- Advertisement -

बीओडीच्या नियमात झाला बदल

नदीमध्ये सोडले जाणारे रसायनयुक्त पाणी, सांडपाण्यावर मलजलशुद्धीकरण केंद्रात प्रकिया केली जाते. पूर्वी प्रकिया करताना पाण्यातील बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड ३० होती. मात्र आता नव्या नियमामुसार हेच प्रमाण १० करण्यात आलेले आहे. यामुळे नदीचे प्रदूषण आणखी कमी होणार आहे. याच दृष्टीने पालिकेच्या वतीने मलजलशुद्धीकरण केंद्रात बदल केले जाणार आहे.

मलजलशुद्धीकरण केंद्राचे होणार अपग्रेडेशन

गोदावरी नदी प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेच्या वतीने तपोवन,आगार टाकळी, चेहेडी, पंचक या ठिकाणी उभारण्यात आलेेल्या मलजलशुद्धीकरण केंद्राचे अपग्रेडेशन केले जाईल.या संदर्भातला प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. या केंद्राचे अपग्रेडेशन झाल्यानंतर नदीत सोडल्या जाणार्‍या पाण्यावर अधिक प्रभावीपणे प्रक्रिया होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.

अंंघोळीसाठीही पाणी अयोग्यच

टाकळी मलजलशुध्दीकरण केंद्रातून बाहेर पडणार्‍या दुषित पाण्यामुळे गोदावरीचे पाणी प्रदूषित होत असल्याचा अहवाल सिंहस्थापूर्वी निरीने दिला होता.हे पाणी पिण्यास दूरच,अंघोळीसह योग्य नसल्याचे अहवालात नमूद केले होते. सिंहस्थाच्या काळात नदीला जोडणारे नाले बंद करण्यात आले होते. त्यामुळे पाणी तुलनेने शुध्द होते. परंतु, त्यानंतर परिस्थिती ‘जैसे थे’ झाली आहे.

फेसयुक्त पाण्याने काय परिणाम होतो?

  • त्वचेचे आजार उदभवतात श्वसनाच्या आजारांतही वाढ होण्याची शक्यता.
  • शेतीवर विघातक परिणाम माशांच्या जीवितास धोका
  • नदीपरिसरातील वातावरणातील प्रदूषण पातळीत वाढ
  • फेसात नक्की कोणते घटक असतात?
  • कॉस्टिक सोडा, सोडियम, ऑइल, ग्रीस, नायट्रोजन, फॉस्फेट, फर्टिलायझर.

फेसाची निर्मिती का होते?

  • नाशिकमधील अनेक छोट्या औद्योगित वसाहतींत पाणी थेट नदीपात्रात जाते.
  • मेटल फिनीशर कंपन्यांमधील दूषित पाणी मोठ्या प्रमाणात नदीपात्रात जाते.
  • घरगुती सांडपाणीही नदीपात्रात मिसळले जाते.
  • नासर्डी नदीपात्रातील सर्वच पाणी गोदावरीत मिसळते.
  • गोदाघाटावर कपडे धुतले जातात.
  • धोबीघाट आणि लॉण्ड्रींचे पाणी नदीपात्रात सोडले जाते.
  • सर्व्हिस स्टेशनचेही पाणी थेट गोदावरीत सोडले जाते.
  • एसटीपीतील पाणी प्रक्रिया न होताही नदीपात्रात जाते.

या होऊ शकतात उपाययोजना

  • सटीपीत सिक्वेंसिअल बॅच रिअ‍ॅक्टर तंत्रज्ञानाचा वापर करणे.
  • छोट्या कंपन्यांसाठी तातडीने फंफ्ल्युऐंट ट्रिटमेंट प्लांट बांधणे.
  • एसटीपीतील पाणी नदीपात्रात न सोडता थेट थर्मल पॉवर स्टेशनपर्यंत पाइपलाइनने नेणे.
  • फोयटोराईड प्रकल्पांची ठिकाठिकाणी उभारणी करणे.
  • एसटीपीत टर्शरी ट्रिटमेंट होणे गरजेचे.

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -