शिवनेरी गडावर आज महाराष्ट्र सरकारतर्फे शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील अजित पवारांबद्दलचे एक वाक्य आता चांगलेच लक्ष्यवेधी ठरत आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, “अजितदादा, आपण इतकी वर्ष उगाच दूर राहिलो. ही वर्ष आपण वाया घालवली. आपण आधीच एकत्र यायला हवे होते. आता आपण एकत्र आलो आहोत ते चांगल्या कामासाठी. आता चांगलं करुन दाखविल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी शपथ छत्रपती शिवाजी महाराज आणि माँ जिजाऊंच्या साक्षीने घेतो.”
"आता जे काही आम्ही एकत्र आलेलो आहोत, आता आम्ही जे काही चांगलं करायचं आहे ते करून दाखविल्याशिवाय राहणार नाही. एवढं एक वचन, एवढी एक शपथ जिजाऊ आणि शिवरायांच्या साक्षीने घेतो."
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) February 19, 2020
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या जयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात शिवनेरी किल्ल्यावर पार पडला. यावेळी उपस्थित शिवप्रेमींना मुख्यमंत्री संबोधित करत होते. यावेळी उपस्थितांपैकी एका शिवप्रेमीने ‘शिवस्मारकाचे लवकर बघा…’ असा आवज दिला. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, “सगळं बघतो. आता लोकांचे सरकार आलेले आहे. त्यामुळे काळजी करु नका. शिवस्मारका सोबतच शिवनेरीचा विकास करण्याकडेही आम्ही लक्ष देऊन”, असे ते म्हणाले.