घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशाह यांचे मुंबई प्रेम बेगडी,महाराष्ट्र तोडण्याचा घाट

शाह यांचे मुंबई प्रेम बेगडी,महाराष्ट्र तोडण्याचा घाट

Subscribe

विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची टिका

नाशिक : केंद्रिय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौरयावर आहेत खरं म्हणजे त्यांचे मुंबई प्रेम बेगडी प्रेम आहे. मुंबईचे महत्व कमी करून ते अहमदाबादला देण्याचे काम सुरू आहे. मुंबईतील अनेक कार्यालये दिल्लीला हलवली असती तर समजू शकलो असतो. परंतू महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा हा घाट असल्याची टिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. सिन्नर येथील पूरपरिस्थिती पाहणी दौरयादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते.

दानवे म्हणाले की, अमित शाह गणपती बाप्पाच्या दर्शनाला आले आहेत. मात्र मुंबईवर बेगडी प्रेम दाखवायचे काम त्यांनी केले आहे. महाराष्ट्र सोशिक राहिला आहे. या सर्वांवर महाराष्ट्र मात करेल, असेही ते म्हणाले. शिवसेनेला पेंग्विन सेना का म्हणू नये, असा टोला आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला होता. त्याला दानवेंनी प्रत्युत्तर दिले. शिवसेना कोणती आणि कशी सेना आहे, हे निवडणुकीच्या मैदानातच स्पष्ट होईल. आशिष शेलारच काय सर्व विरोधकांना ते दाखवून देईल, असा टोला त्यांनी आशिष शेलारांना लगावला. विधान परिषदेवर नियुक्त करावयाच्या १२ आमदारांची यादी राज्यपालांनी रदद केली. याबाबत बोलतांना ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकार असताना अनेक निर्णयांचा पाठपुरावा केला. मात्र राज्यपालांनी तत्परता दाखवली नाही. आता शिंदे-फडणवीसांच्या काळात प्रलंबित 12 आमदारांच्या यादीवर निर्णय लवकर होणार आहे. यावरून राज्यपालांची तत्परता दिसून येते, असा टोला दानवेंनी भगतसिंग कोश्यारी यांना लगावला आहे. म्हणजे ज्या निर्णयांसाठी दोन-दोन, तीन-तीन वर्ष वाट पाहावी लागत होती, ते निर्णय दोन-तीन मिनिटांत घेतले जात आहेत. त्यामुळे आगामी काळात याविषयी निश्चित भूमिका घेऊ, असे ते म्हणाले. सामना हे ज्वलंत विचाराचे वर्तमानपत्र आहे. त्याचे विचार देशपातळीपर्यंत पोहोचतात, असेही दानवे यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -