माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बाण सोडल्यानंतर आता शिवसेनेकडूनही त्याला जशासतसे उत्तर देण्यात आले आहे. ‘केवळ आडनाव ठाकरे असून चालत नाही’ अशी टीका अमृता फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली होती. त्याला शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी उत्तर दिले आहे. “सत्तालोभी आनंदीबाईंनी रघुनाथदादा पेशेवे यांची बुद्धी भ्रष्ट केली आणि राघोबांनी नैतिकतेचाच मुडदा पाडला आणि राघोबा खलनायक ठरले. वर्तमानात इतिहास विसरायचा नसतो.” अशी घणाघाती टीका अमेय घोले यांनी केली आहे.
इतिहासात रघुनाथदादा पेशवे हे बुद्धिमान, पराक्रमी असल्याचे सुरुवातीचे उल्लेख आहेत. सत्तालोभी आनंदीबाईंनी त्यांची बुद्धी भ्रष्ट केली. त्यांनी नैतिकतेचाच मुडदा पाडला आणि राघोबा खलनायक ठरले. वर्तमानात इतिहास विसरायचा नसतो! #ठाकरेठाकरेच! #आजच्याआनंदीबाई https://t.co/5GWTWJaCe6
— Amey Ghole (@AmeyGhole) December 22, 2019
काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस?
अमृता फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट कोट करत ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. राहुल गांधी यांनी मी माफी मागायला सावरकर नाही, असे वक्तव्य केल्यानंतर भाजपने या वक्तव्याचा निषेध केला होता. “राहुल गांधी हे सावरकरांच्या एकाही चांगल्या गोष्टीच्या जवळपास देखील नाहीत. तसेच त्यांचे आडनाव फक्त गांधी आहे. त्यामुळे ते काही गांधी होत नाहीत.”, अशी टीका फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये केली होती. या ट्विटला उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली. “ठाकरे आडनाव असल्याने कोणी ठाकरे होत नाही. ठाकरे यांनी (बाळासाहेब ठाकरे) कायम सत्य, आपली तत्वे आणि लोकांचा आपल्या कुटुंबापेशाही जास्त आदर केला.”
Very true @Dev_Fadnavis ji ! One cannot be a ‘Thackeray’ also by just putting ‘Thackrey’ surname after his name ! One needs to be true, principled & should think for betterment of people & party members above his own family & power dynamics ! @ShivSena @OfficeofUT https://t.co/3W0AsvcTeG
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) December 22, 2019