घरमहाराष्ट्रलढण्यासाठी आम्हाला भाडोत्री लोक लागत नाहीत; राऊतांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

लढण्यासाठी आम्हाला भाडोत्री लोक लागत नाहीत; राऊतांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

Subscribe

राऊत पुढे म्हणाले की, “महाराष्ट्रातील वातावरण काही राजकीय पक्ष हे जाती, धर्माच्या नावावर खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे योग्य नाही. शिवसेनेच्या बदनामीची आणि खास करून महाराष्ट्राच्या बदनामीचा एक व्यापक कट काही असमाजिक संघटना, तत्व या ठिकाणी एकत्र येऊन सुरू केलेल्या आहेत.

“शिवसेना छातीवर वार झेलणार पक्ष आहे आणि समोरून वार करणारा पक्ष आहे, हे पाठीमागचे वार आमच्यात चालत नाहीत. आम्हाला लढण्याचं प्रशिक्षण देण्याची गरज नाही आणि लढण्यासाठी आम्हाला भाडोत्री लोक देखील लागत नाहीत. आम्ही दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून लढत नाही. आमची हत्यारं आमचीच आहेत आणि ती धारंधार आहेत, दोन घाव बसले तर पाणी मागणार नाही.” अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपासह राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. आज सकाळी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवास्थानी घेतलेल्या बैठकीसंदर्भातही माहिती दिली.

“…तर त्या पाण्यात आम्हाला इतरांना बुडवावं लागेल”

यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, “आतापर्यंत आम्हाला सत्ता किंवा सरकार असल्यामुळे काही बाबतीत संयम आम्ही बाळगला किंवा ते बाळगणं संयुक्तीक असतं. पण जर पाणी डोक्यावरून जाणार असेल, तर त्या पाण्यात आम्हाला इतरांना बुडवावं लागेल. मग त्यांना गटांगळ्या खाव्या लागतील. आम्हाला लढण्याचं प्रशिक्षण देण्याची गरज नाही आणि लढण्यासाठी आम्हाला भाडोत्री लोक देखील लागत नाहीत. आम्ही दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून लढत नाही. आमची हत्यार आमचीच आहेत आणि ती धारंधार आहेत… दोन घाव बसले तर पाणी मागणार नाही.” अशा शब्दात संजय राऊतांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

“महाराष्ट्रातील वातावरण जाती, धर्माच्या नावावर खराब करण्याचा प्रयत्न”

राऊत पुढे म्हणाले की, “महाराष्ट्रातील वातावरण काही राजकीय पक्ष हे जाती, धर्माच्या नावावर खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे योग्य नाही. शिवसेनेच्या बदनामीची आणि खास करून महाराष्ट्राच्या बदनामीचा एक व्यापक कट काही असमाजिक संघटना, तत्व या ठिकाणी एकत्र येऊन सुरू केलेल्या आहेत. अनेक माध्यमातून त्यांना महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करायची आहे, सरकारसमोर अडचणी निर्माण करायच्या आहेत. या सगळ्याला उत्तर देणं गरजेचं आहे, असं पक्ष प्रमुखांचं म्हणणं आहे. यावर आम्ही सगळ्यांनी सांगितलं आहे की, कोणत्याही प्रसंगाला शिवसेना सामोरं जाण्यासाठी तयार आहे. कोणीही समोर येऊ द्या. शिवसेना छातीवर वार झेलणार पक्ष आहे आणि समोरून वार करणारा पक्ष आहे, हे पाठीमागचे वार आमच्यात चालत नाहीत.”

“हा शिवसेनेचा धर्म आणि स्वभाव”

मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, “हा शिवसेनेचा धर्म आणि स्वभाव आहे. जशाच तसं उत्तर आम्ही नेहमीच देत असतो. हे आमचं बाळकडू आहे. शिवसेना प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर सगळ्यांची बैठक घेतली, खासदरांची एक वेगळी बैठक घेतली प्रवक्त्यांची एक वेगळी बैठक घेतली. त्यांनी काही नक्कीच सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनांचं पालन नक्कीच योग्य पद्धतीने होईल.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


raj thackeray aurangabad sabha : राज ठाकरे औरंगाबादच्या दिशेने रवाना; पुरोहितांचे घेतले आशीर्वाद

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -