घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'बँक घोटाळा प्रकरणी कारवाई करा; अन्यथा, मंत्रालयाच्या ६व्या मजल्यावरून उडी मारेल'

‘बँक घोटाळा प्रकरणी कारवाई करा; अन्यथा, मंत्रालयाच्या ६व्या मजल्यावरून उडी मारेल’

Subscribe

अकोले : राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याबाबत योग्य ती कारवाई करावी अन्यथा 12 डिसेंबर रोजी मंत्रालयाच्या 6 व्या मजल्यावरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपवू, असे पत्र राज्याचे शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.

लातूरचे माजी आमदार माणिक जाधव यांनी राज्य सहकारी बँकेतील घोटाळा काढला असून, त्यातून ज्या काही गोष्ट बाहेर जनतेसमोर आणल्या आहेत. त्यात पवार काका-पुतण्याचा मोठा हात आहे. त्यांनी राज्यातील साखर कारखाने कवडीमोल किमतीने घेऊन त्या फाईल्स सिंचन घोटाळ्यासह बंद का केल्या आहेत. राज्यात उलथापालथ होऊनही राज्य सरकार गप्प का आहे. यावरून पुन्हा एकदा पहाटेचा अयशस्वी झालेला प्रयोग करून राज्यात सत्तेची बळकटी करून काका-पुतण्याला पावन करण्याचा इरादा आहे का? असा सवालही सावंत यांनी केला आहे.

- Advertisement -

राज्य बँक चौकशीप्रकरणी फेरचौकशीचा जो आदेश होऊन त्यावर राज्य सरकारने चौकशी करावी व त्यावर श्वेतपत्रिका काढण्याचे जाहीर करावे तसे व्यक्तिगत पत्र तुमच्या स्वाक्षरीने 12 डिसेंबर पर्यंत द्यावे अन्यथा, 12 डिसेंबर रोजी शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हा दोघांचा निषेध करून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून जीवनयात्रा संपविणार असल्याचे सावंत यांनी फडणवीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -