घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरे इतके लोकप्रिय की त्यांना पंतप्रधानही केले पाहिजे!

उद्धव ठाकरे इतके लोकप्रिय की त्यांना पंतप्रधानही केले पाहिजे!

Subscribe

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे विधान

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे इतके लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत की, त्यांना पंतप्रधानसुद्धा केले पाहिजे. त्यांनी लोकाभिमुख प्रशासन दिले असून ते शक्य आहे. लोकांना केंद्रभागी ठेवून हे करता येते, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. रविवारी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. प्रश्नम या संस्थेने देशातील १३ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत मतदारांकडे सर्वेक्षण केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना पृथ्वीराज चव्हाण यांनी हे विधान केले.

- Advertisement -

चव्हाण यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका देखील केली, मोदींची केवळ प्रसिद्धी आहे. अगदी लसीकरणाबाबत बोलायचे झाले तर, चार दिवस लसीकरण थांबवायचे आणि पाचव्या दिवशी रेकॉर्ड झाला म्हणून पाठ थोपटवून घ्यायची. यामुळे किती लोकांचे जीव चाललेत. मोदींच्या व त्यांच्या टीमच्या अकार्यक्षम कारभारामुळे किती जणांचे नाहक बळी गेलेत, याचा मला वाटतं कधीच निश्चित आकडा आपल्याला कळणार नाही. आज चार लाखांपेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. यापैकी मोदींच्या हलगर्जीपणामुळे किती जणांचा मृत्यू झाला? हे समजायला हवे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलून दाखवले.

एखाद्याच्या अंगावर कुत्रा सोडल्यासारखे सुरू आहे. अंतिम निर्णय कुठेच नाही. अशा पद्धतीने आज केंद्राकडून ईडीच्या चौकशी सुरू आहे. एखाद्याकडून गुन्हा घडला असल्यास, त्या गुन्हेगाराला न्याय प्रक्रिया झाल्यानंतर शिक्षा व्हायला पाहिजे. पण आज हे कुठेही होताना दिसत नाही. तसेच अनेक जणांना तुरुंगात टाकले जात असून, काहींवर धाडी टाकण्यात येत आहे; पण शेवटी काहीही होताना दिसत नाही. ज्यांनी पक्ष बदलला त्यांच्या चौकशा होत असून चौकशी समितीचा फक्त ब्लॅकमेलिंग करण्यासाठी उपयोग होत आहे, असा आरोपही यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

- Advertisement -

नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याबाबत बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, नारायण राणे मंत्री झाले त्यांचे अभिनंदन. ते माझे सहकारी होते. कुणाला मंत्री म्हणून घ्यायचेआणि कुणाला घ्यायचे नाही. कुणाला कुचकामी ठरवायचे, अकार्यक्षम ठरवायचे हा मोदींचा अधिकार आहे. काही जणांना कार्यक्षम ठरवले आहे, काही जणांना हाकलून दिले आहे, हा त्यांचा अधिकार आहे. मी त्यावर कसे बोलणार. कुठलाही पंतप्रधान हा देशाला चांगले प्रशासन देण्याचा प्रयत्न करत असतो, आता मोदींचा आकलनानुसार ते १२ मंत्री अपयशी ठरले. कार्यक्षम नव्हते म्हणून त्यांच्या जागी त्यांनी काही नवीन माणसे घेतली आहेत आणखी काही येतील माणसे. आता ते कसे काम करतात आपण पाहूया.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -