घरमहाराष्ट्रनागरिकांचा महापालिका भवनावर धडक मोर्चा

नागरिकांचा महापालिका भवनावर धडक मोर्चा

Subscribe

विकास कामावर अजिबात पैसा खर्च झाला नाही. मग ही गावे फक्त पैसे वसुलीसाठी समाविष्ट केली का? का असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या ११ गावातील त्रस्त नागरिकांचा येत्या सोमवारी महापालिका भवनावर धडक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. खा. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वाखाली हा मोर्चा होणार आहे. पुणे महापालिकेमध्ये ११ गावे समाविष्ट झाली. पण विकासकामची बोंब आहे. पालिका प्रशासनाने ११ गावाकडून विविध करापोटी करोडो रुपये जमा करून घेतले. लोहगांव आणि परिसरातील पाणी, कचरा, वीज, स्ट्रीट लाईट, आरोग्य, ड्रेनेज इत्यादी प्रश्नाबाबत वेळोवेळी पालिकेच्या क्षेत्रीय अधिकारी यांना तोंडी व लेखी निवेदन दिले. यासाठी बैठकी घेण्यात आल्या पण त्याचा काडीमात्र ही परीणाम झाला नाही. त्यामुळे लोहगावातील नागरिकांना १० दिवसात एकदा पाणी मिळत आहे. लोहगांव मधून एका वर्षात तब्बल साडेनउ कोटी रूपये जमा करून घेतले. मात्र, विकास कामावर अजिबात पैसा खर्च झाला नाही. मग ही गावे समाविष्ट कशासाठी करून घेतली फक्त पैसे वसुलीसाठी का असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.


पाहा : तलवारबाजीनंतर सुप्रिया ताईंची मैदानावर फलंदाजी


मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि ११ गावातील विकास कामे करण्यासाठी पालिकेच्या बजेट मध्ये तरतूद करण्यात यावी. या मागणीसाठी पालिकेवर बालगंधर्व चौकापासुन धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी दिली आहे.

- Advertisement -

वाचा : मोदी घरी बोलवून अपमान करतात – गडकरी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -