घरमहाराष्ट्रऔरंगाबादमधील मृत्यूशी झुंजणाऱ्या महिलेचा मृत्यू!

औरंगाबादमधील मृत्यूशी झुंजणाऱ्या महिलेचा मृत्यू!

Subscribe

रविवारी रात्री औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात एका ५० वर्षीय महिलेला गावातील बीअर बार चालकाने रात्री घरात घुसून अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. या घटनेतील महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला ९५ टक्के भाजली होती. या महिलेवर महिलेवर औरंगाबादमधील घाटी रूग्णालयात उपचार सुरू होते.

ही महिला घरात एकटी झोपलेली असताना संतोषने दरवाजा वाजवला आणि आत घुसला. त्यानंतर त्या दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन हा प्रकार घडला. या घटनेतील आरोपी संतोष सखाराम मोहिते याला ग्रामिण पोलिसांनी अटक केली आहे. संतोष विरोधात खुनाचा प्रयत्न व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोषला न्यायालयाने १० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

महिलेच्या मृत्यू नंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी ट्वीट करत केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -