घरताज्या घडामोडीमुंबईत काही ठिकाणी मुस्लिमांना भडकवण्याचे काम केले जातेय, मुख्यमंत्र्यांनी करा कारवाई -...

मुंबईत काही ठिकाणी मुस्लिमांना भडकवण्याचे काम केले जातेय, मुख्यमंत्र्यांनी करा कारवाई – अबू आझमी

Subscribe

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी काही लोकांद्वारे मुंबईतील शांती भंग करण्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, ‘समाजविरोधी घटकांद्वारे मुंबई शहरात शांतीपूर्ण वातावरण बिघडवले जात आहे. जाणूनबुजून रमजानच्या महिन्यात कमी मुस्लिम लोकसंख्या असलेल्या भागात मशिदीसमोर ‘जय श्री राम’ची घोषणेसोबत डीजे वाजवला जात आहे. जेणेकरून लोकं भडकतील.’ यामुळे अबू आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अबू आझमी यांवर फेसबुकवर लिहिले आहे की, ‘समाजविरोधी घटकांद्वारे मुंबई शहरात शांतीपूर्ण वातावरण भंग केले जात आहे. जाणूनबुजून रमजानच्या महिन्यात कमी मुस्लिम लोकवस्ती असलेल्या भागात मशिदीसमोर ‘जय श्री राम’ घोषणेसोबत डीजे वाजवला जात आहे. जेणेकरून लोकं भडकतील आणि आपापसात भिडतील. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुंबई पोलीस आयुक्तांना या घटनेतील जबाबदार लोकांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करतो.’

- Advertisement -

पुढे आझमी यांनी लिहिले की, ‘अशाप्रकारची घटना रविवारी मानखुर्द पीएमजी कॉलनी, मालाडच्या मालौनी भागात घडली. गाड्यांची तोडफोड केली आहे, तलावारी काढल्या, लोकांचे नुकसान केले गेले. मुंबई पोलिसांना सर्व घटनेची माहिती होती. पोलिसांना समजले पाहिजे आणि मुंबई शहर आणि राज्यात शांती भंग करणाऱ्या समाजविरोधी घटकांविरोधात कडक कारवाई केली पाहिजे.’


हेही वाचा –  अभिनेत्री आएशा टाकियाचा नवरा आणि अबू आझमींचा मुलगा फरहानसोबत गोवा विमानतळावर गैरवर्तन

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -