मनसेने पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात चले जाव अभियान हाती घेतल्यानंतर आता विरारमधून २३ बांगलादेशींवर कारवाई करण्यात आली आहे. विरारच्या अर्नाळा पोलिसांनी ही कारवाई केली असून अर्नाळा, कळंब, राजोडी या परिसरातून तब्बल २३ बांगलादेशी पुरुष आणि महिलांना अटक करण्यात आली आहे.
अनैतिक मानवी वाहतूक, पालघर दहशतवादी विरोधी पथक आणि अर्नाळा पोलिसांनी संयुक्तरित्या ही मोहीम पार पाडली. मंगळवारी रात्री सापळा रचून या बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आले. पकडलेल्यांपैकी १२ पुरुष तर १० महिला आणि एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. या सर्वांवर अर्नाळा सागरी पोलीस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.