घरमुंबईआशिष शेलार यांच्यासह कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी; पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार

आशिष शेलार यांच्यासह कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी; पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार

Subscribe

याबाबत आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून आमदार आशिष शेलार यांना आलेल्या धमकीची माहिती देण्यात येणार असल्याचे समजते.

भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांच्यासह कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एका अज्ञात व्यक्तींने मोबाईलवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. या प्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी दोन वेगवेगळ्या फोन नंबरवरून अज्ञात व्यक्तींकडून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यात येत आहे. तर सातत्याने आशिष शेलार यांच्यांसह कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहे. मुंबईतील अनेक प्रश्नांवर आशिष शेलार आक्रमक भूमिका घेत असतात. मुंबईतील भ्रष्टाचार किंवा सत्ताधारी पक्षांच्या निर्णयावर आशिष शेलार विधानसभेतही आवाज उठवत असतात. शेलार यांनी यासंदर्भात पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तक्रार केली आहे. या पत्रात त्यांनी दोन्ही अज्ञात मोबाईल नंबरची माहिती देत तपास करण्याची विनंती केली आहे. याप्रकरणी ते राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही पत्र लिहून तातडीने कारवाई करण्याची मागणी करणार आहे.

- Advertisement -

दरम्यान २०२० मध्येही आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका आरोपीला वांद्रे पोलिसांनी मुंब्रा येथून अटक केली होती. तर यापूर्वी दहशतवाद्यांकडूनही आशिष शेलार यांच्यसह दोन हिंदूत्ववादी व्यक्तींची रेकी केल्याची माहिती समोर आली होती. आता पुन्हा अतिरेक्यांकडून नागपूरात संघ मुख्यालयाची रेकी करण्यात आल्याचे उघड झाले असून त्याच दरम्यान गेले दोन दिवस आमदार अँड आशिष शेलार यांना धमकीचे फोन येत असल्याने ही बाब गंभीर आहे

याबाबत आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून आमदार आशिष शेलार यांना आलेल्या धमकीची माहिती देण्यात येणार असल्याचे समजते.

- Advertisement -

सरकारविरोधात भूमिका मांडतात म्हणून धमकी – देवेंद्र फडणवीस 

“आशिष शेलार हे सातत्याने सरकारच्या विरोधात भूमिका मांडत असतात. सरकारमधील भष्ट्राचार असेल, सरकारमधील अनागोंदी कारभार ते बाहेर आणतात, संघर्ष करतात. त्यामुळे अशाप्रकारची धमकी आली असेल आणि पोलिसांनी ही धमकी गांभीर्याने घेतली पाहिजे.” असं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -