घरमुंबईडॉ. दाभोलकरांच्या हत्येमागील मुख्य सूत्रधाराला केव्हा अटक होणार? - अंनिस

डॉ. दाभोलकरांच्या हत्येमागील मुख्य सूत्रधाराला केव्हा अटक होणार? – अंनिस

Subscribe

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला येत्या २० ऑगस्ट रोजी ६ वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे 'हिंसा के खिलाफ, मानवता की ओर' हा संदेश देत निर्भय मॉर्निंग वॉकचे आयोजन केले होते.

पुरोगामी कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला येत्या २० ऑगस्ट रोजी ६ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांच्या हत्येच्या सूत्रधाराचा तपास लागला नाही. कॉ. गोविंद पानसरे, प्रा. एम एम कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्याही हत्या झाल्या. हिंसेच्या घटनात वाढ होतच आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ हा संदेश देत निर्भय मॉर्निंग वॉकचे आयोजन केले होते. आज, रविवारी सकाळी दहिसर पूर्व रेल्वे स्टेशनपासून ही निर्भय रॅली सुरू झाली. तर जरीमरी गार्डन येथे रॅलीची सांगता झाली. मुंबई जिल्ह्यातील तसेच आसपासच्या परिसरातील सर्व कार्यकर्ते व मानवतावादी नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

महाराष्ट्र अंनिसतर्फे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा सूत्रधार कोण?, असा सवाल विचारणारे निवेदन माननीय मुख्यमंत्री व प्रधानमंत्री यांना आपण देणार असल्याचे महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव नंदकिशोर तळाशीलकर यांनी यावेळी सांगितले. तसेच २० ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस’ म्हणून सर्वत्र साजरा केला जात असल्याचे ही त्यांनी नमूद केले. राज्यभरात घडणाऱ्या हिंसक घटनांचा महाराष्ट्र अंनिसतर्फे नेहमीच आम्ही निषेध करत आलो आहोत आणि यापुढे ही आम्ही हा हिंसाविरोधी व मानवतेचा पुरस्कार करणारा लढा सतत चालूच ठेवू, असा निर्धार यावेळी महाराष्ट्र अंनिसच्या दहिसर शाखेची प्रधान सचिव निशा हिने सर्व तरुणांच्या वतीने व्यक्त केला.

- Advertisement -

हेही वाचा –

पूरग्रस्तांसाठी जाणार मुंबईतून मोफत ‘बाप्पा’!

सत्ता मिळाल्यास मोहन भागवतांना २ दिवस तरी तुरुंगात टाकणार – प्रकाश आंबेडकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -