घरमुंबईसोमवारपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात, आरोप-प्रत्यारोप सुरू

सोमवारपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात, आरोप-प्रत्यारोप सुरू

Subscribe

पीएम किसान योजनते १ कोटी २० लाख शेतकऱ्यांना फायदा झाला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस सरकारसाठी महत्वपूर्ण अशा पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत असून, या अधिवेशनात १३ नवीन आणि १५ प्रलंबित विधेयके यामध्ये १२ विधानसभेत आणि ३ विधेयके विधान परिषदेत अशी एकूण २८ विधेयक चर्चेला येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला दिली. सह्याद्री अतिथीगृहात सरकारी शिष्टाचारानुसार चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. दरम्यान विरोधकांनी या चहापानावर घातलेल्या बहिष्कारावर मुख्यमंत्र्यांनी जोरदार टीका केली. या अधिवेशनात विविध मुद्द्यांवर चर्चा होईल, विशेषतः दुष्काळावर सत्ताधारी आणि विरोधकांकडून चर्चा होईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

‘सुमारे ४७०० कोटी रुपयांचे थेट अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने जमा केले आहे. ३२०० कोटी रुपये विम्याचे अनुदानाचे वाटप सुरु आहे. आवश्यक तेवढ्या चारा छावण्या तयार केल्या आहेत. यामध्ये जनावरांच्या पालन-पोषणाचा दर वाढवला, टँकरने पाणी पुरवठा केला. तसेच चारा छावणीच्या नावाखाली भ्रष्टाचार करता येऊ नये, यासाठी जनावरांचे टॅगिंग करण्यात आले. पहिल्यांदाच छोट्या जनावरांसाठीही चारा छावण्यात तयार केल्या. त्या व्यवस्थित सुरु आहेत. तसेच पीएम किसान योजनेअंतर्गत १ कोटी २० लाख शेतकऱ्यांना थेट निधी देण्याचा निर्णय’ झाल्याचे मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले.

- Advertisement -

‘विरोधक अजूनही भ्रमात’

दरम्यान, चहापानावर बहिष्कार घालत विरोधकांनी हे सरकार आभासी असल्याची टीका केली. ‘विरोधक आरोप करीत आहेत, मात्र, ते स्वतःच या भ्रमात आहेत. त्यांची जमिनीशी नाळ तुटलेली आहे. म्हणूनच यांना लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला’, अशी टीका देखील मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच, विरोधकांकडे एकही नवीन मुद्दा नसल्याचे त्यांच्या पत्रकार परिषदेतून दिसले. मात्र तरीही विरोधक जे मुद्दे मांडतील त्याला आम्ही जसासतसे उत्तर देऊ. तसेच, आघाडी सरकारच्या १५ वर्षांच्या काळात त्यांनी ज्या समाजांना फसवले, त्या प्रत्येक समाजाला न्याय देण्याचे आम्ही काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विरोधी पक्षाने सांगितले की मराठा आरक्षणात घोळ झाला, पण इतकी वर्षे कुणी घोळ केला हे सांगायची गरज नाही, असे देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.


हेही वाचा – मंत्रीमंडळातून ‘या’ सहा जणांना डच्चू; मुख्यमंत्र्यांनी स्विकारले राजीनामे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -