घरमुंबईसीबीएसई शाळेविरोधात पालक पोलीस ठाण्यात!

सीबीएसई शाळेविरोधात पालक पोलीस ठाण्यात!

Subscribe

अंधेरीतील अशोका अ‍ॅकडमी या सीबीएसई शाळेतील दक्ष काटकर या विद्यार्थ्याला दहावीच्या परीक्षेत 88 टक्के गुण मिळाले होते. परंतु दक्षला अंतर्गत परीक्षेत मिळालेले गुण शाळेने कमी करून सीबीएसई बोर्डाला पाठवल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे. शाळेने गुण कमी केले नसते तर दक्षला 93 टक्के गुण मिळाले असते, असे त्याच्या पालकांचे म्हणणे आहे.

अंधेरी लोखंडवालामधील अशोका अकॅडमी या सीबीएसई अभ्यासक्रम शिकवणार्‍या शाळेने दहावीच्या मुलांना अंतर्गत परीक्षेमध्ये मिळालेले गुण मुद्दामहून कमी करून सीबीएसई बोर्डाला पाठवल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांच्या पालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची लेखी विनंती केली आहे. त्यामुळे पालकांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसेनेचे वर्सोवा विभागअध्यक्ष संदेश देसाई आणि शाखाध्यक्ष प्रशांत राणे यांनी पुढाकार घेतला आहे. सीबीएसई दहावीच्या परीक्षेच्या निकालात शाळेत वर्षभरात होणार्‍या अंतर्गत परीक्षेचे गुण अत्यंत महत्वाचे असतात. प्रत्येक विषयाची ही अंतर्गत परीक्षा २० गुणांची असते.

- Advertisement -

मात्र अशोका अकॅडमीच्या अनेक हुशार विद्यार्थ्यांना अंतर्गत परीक्षेत मिळालेले गुण शाळेने मुद्दामहून कमी करून बोर्डाला पाठवल्याचा आरोप पालकांनी केला आहे. ज्या विद्यार्थ्यांना लेखीपरीक्षेत ९० टक्के गुण मिळाले आहेत, त्या विद्यार्थ्यांना अंतर्गत परीक्षेत अत्यंत कमी गुण मिळाल्यामुळे त्यांचे एकत्रित गुण ८५ टक्क्यांवर आल्याचे पालकांचे म्हणणे आहे. मात्र आपली ही तक्रार शाळेपर्यंत नेण्याचा प्रयत्न केल्यानंतरही मुख्याध्यापिका मंजू तिवारी यांनी अपेक्षित प्रतिसाद न दिल्यामुळे पालकांनी ओशिवरा पोलीस ठाणे गाठले. १३ पालकांनी त्यांचे स्वाक्षरी केलेले पत्र राज ठाकरे यांना दिले आहे. हे पालक शाळेत गेले असता त्यांना बाऊन्सर्सचा धाक दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलीस घेऊन आम्ही काल मुख्याध्यापिका मंजू तिवारी यांच्या घरी गेलो, मात्र त्यांनी कोणतीही चर्चा करण्यास नकार दिला असेही विभागअध्यक्ष संदेश देसाई यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात शाळेच्या अध्यक्षा दिलशाद इराणी आणि मुख्याध्यापिका मंजू तिवारी यांच्याशी झालेल्या बैठकीत त्यांनी शाळेकडून अंतर्गत परीक्षेच्या गुणांमध्ये चूक झाल्याचे कबूल केले होते. शाळेने सीबीएसई बोर्डाला यासंदर्भात ईमेल पाठवला असून त्यांच्याकडून गुणपत्रिकेत बदल करण्याबाबत प्रतिसाद अपेक्षित असल्याचे त्यांनी पालकांना सांगितले. मात्र कोणतीही गोष्ट लेखी द्यायला त्यांचा नकार आहे असे फरहान या विद्यार्थ्याचे पालक रेझा मुल्ला यांनी सांगितलं.

- Advertisement -

आपल्या पाल्यांच्या गुणपत्रिकेत सुधारणा करून मिळावी व त्यासाठी शाळा प्रशासनाशी अधिकृतपणे बोलणी करता यावी, यासाठी विद्यार्थ्यांचे पालक शुक्रवारी सकाळपासून ओशिवरा पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. दरम्यान, या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांचा विषय आम्ही आता शिक्षण खात्याच्या सचिवांपुढे मांडणार आहोत असे मनसेचे विभागअध्यक्ष संदेश देसाई व शाखाध्यक्ष प्रशांत राणे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -