मुंबईत पुढील चार दिवस धोक्याचा इशारा दिला आहे. शनिवार १४ ते मंगळवार १७ जुलै या दरम्यान समुद्राला मोठी भरती असून यादरम्यान समुद्रात ४.७० ते ४.९७ मिटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. या कालावधीत मुंबईत मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्यास मुंबई जलमय होण्याची शक्यता आहे. जुलै महिन्याच्या प्रारंभी रिमझिम बरसणाऱ्या पावसाने शनिवार मध्यरात्री पासून चांगलाच जोर धरला. मंगळवारपर्यंत मुंबईत धो-धो पाऊस सुरू होता. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबले तसेच रेल्वे रुळही पाण्याखाली गेले. मात्र यादरम्यान समुद्राला मोठी भरती नव्हती. त्यामुळे भरतीचे पाणी शहरात शिरून मुंबई पूर्णपणे ठप्प झाली नाही. गेल्या महिन्यात १३ ते १८ जून या कालावधीतही समुद्रात साडेचार मीटरपेक्षाही उंच लाटा उसळल्या. मात्र यादरम्यान मोठा पाऊस नसल्याने याचाही तितकासा परिणाम जाणवला नाही. दरम्यान, शनिवार १४ जुलै ते मंगळवार १७ जुलै यादरम्यान समुद्राला मोठी भरती असून समुद्रात शनिवारी ४.९६, रविवारी ४.९७ सोमवार ४.८९ व मंगळवारी ४.७० मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. या कालावधीत मुंबईत अतिवृष्टी झाल्यास मुंबईत पूरस्थिती निर्माण होऊन मुंबई ठप्प होण्याची शक्यता आहे.
मुंबईसाठी पुढील ४ दिवस धोक्याचे
written By Web Team
Mumbai
समुद्रात उसळणार उंचच उंच लाटा, हवामान खात्याचा अंदाज
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -