घरमुंबईआता वंचितचा काँग्रेसला ४० जागांचा प्रस्ताव

आता वंचितचा काँग्रेसला ४० जागांचा प्रस्ताव

Subscribe

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याची तयारी दाखवली असली तरी वंचित काँग्रेससोबत जाण्यास तयार नसल्याचे दिसत असून, आता वंचित बहुजन आघडीने आम्ही काँग्रेसला ४० जागा सोडत आहोत, असे सांगत काँग्रेसवर टीका केली.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याची तयारी दाखवली असली तरी वंचित काँग्रेससोबत जाण्यास तयार नसल्याचे दिसत असून, आता वंचित बहुजन आघडीने आम्ही काँग्रेसला ४० जागा सोडत आहोत, असे सांगत काँग्रेसवर टीका केली. महासचिव गोपीचंद पडळकर यांनी मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस वंचितला जाणीव पूर्वक बदनाम करत असून, आता आम्ही काँग्रेसला ४० जागा सोडत असल्याचा प्रस्ताव दिला.

काँग्रेसला १० दिवसाचा अल्टीमेटम –

सगळ्यात महत्वाचे म्हणजे काँग्रेसला आमचा प्रस्ताव मान्य असल्यास तर त्यांनी १० दिवसांत आमच्याशी संपर्क साधावा, असे देखील पडळकर म्हणाले. तसेच जागाबाबत कुणीही वंचितचा पदाधिकारी काँग्रेसला भेटला नाही मात्र जाणीवपूर्वक माध्यमातून उलट सुलट चर्चा घडवून आणल्या जात आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत वंचितला जास्त मते मिळाली असून, आता आम्ही काँग्रेसला किती जागा सोडणार हे ठरवणार आहोत, असे देखील ते म्हणालेत. तसेच ईव्हीएमबाबत काँग्रेसने अजूनही भूमिका घेतलेली नसून त्यामुळे कॉंग्रेसबद्दल आमच्या मनात संभ्रम असल्याचे ते यावेळी म्हणाले.

- Advertisement -

अनेक जण आमच्या संपर्कात –

एवढेच नाही तर २०१४ आणि २०१९ ची परिस्थिती वेगळी असून, ज्यांना काँग्रेस अथवा भाजपामधून तिकीट मिळणार नाही ते आमच्या संपर्कात असल्याचे देखील पडळकर म्हणाले. तसेच वंचित भाजपाची बी टीम असल्याचा आरोप काँग्रेस करत आहे. मात्र त्याचा खुलासा मात्र काँग्रेस करू शकलेली नसल्याचे सांगतआम्हाला ४१ लाख मत मिळाली आहेत. त्यामुळे काँग्रेस घाबरल्याचे पडळकर म्हणाले.

काँग्रेसची प्रतिक्रिया

वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेस पक्षाला विधानसभेच्या ४० जागा देण्याचे केलेले वक्तव्य अत्यंत गंमतीशीर आहे. देशात आणि राज्यात अभूतपूर्व अशा तऱ्हेचा धोका सामाजिक ऐक्याला व लोकशाहीला निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीत पुरोगामी व धर्मनिरपेक्ष विचारांच्या पक्षांनी एकत्र यायला पाहिजे. याकरिता काँग्रेस पक्ष गांभीर्याने प्रयत्न करत आहे. संविधानाचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे रक्षण करण्याकरता काँग्रेस पक्ष ज्या गांभीर्याने विचार करत आहे. त्याच गांभीर्याने इतर पक्षांनीही विचार करावा, अशी अपेक्षा आहे, ही प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -