मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळाने १६९ मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. विरोधात शून्य मतदान झाले तर चार आमदारांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. २८ नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्कवर जेव्हा उद्धव ठाकरे आणि इतर सहा मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यावेळी राज ठाकरे देखील शपथविधीला उपस्थित होते. त्यामुळे सभागृहात बहुमत चाचणीच्या वेळी मनसेचा एकमेव आमदार काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष होते. बहुमत चाचणी होत असताना मनसेचे कल्याण ग्रामीणचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या ‘महाराष्ट्रविकास’ आघाडीने विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करत १६९ आमदारांनी ठरावाच्या बाजुने मतदान केले तर चार आमदार तटस्थ राहिले. त्यामुळे महाविकास आघाडीने बहुमताचा प्रस्ताव १६९ मत विरोधात भाजपाने सभा त्याग केल्याने विरोधात शून्य मते पडली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या सरकारने १६९ मतांनी हा प्रस्ताव जिंकला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या ‘महाराष्ट्रविकास’आघाडीने विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करत १६९ आमदारांनी ठरावाच्या बाजुने मतदान केले तर चार आमदार तटस्थ राहिले. त्यामुळे महाविकास आघाडीने बहुमताचा प्रस्ताव १६९ मत विरोधात भाजपाने सभात्याग केल्याने विरोधात शून्य मते पडली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या सरकारने १६९ मतांनी हा प्रस्ताव जिंकला आहे.