घरमुंबईपुन्हा लॉकडाऊन कडक करणार; आठ दिवसात होणार निर्णय

पुन्हा लॉकडाऊन कडक करणार; आठ दिवसात होणार निर्णय

Subscribe

निर्बंध शिथिल झाल्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये बरे होणार्‍या कोरोना रुग्णांच्या संख्येपेक्षा नव्या रुग्णांची संख्या जास्त असल्याचे मागील दोन दिवसात आढळून येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने पुन्हा एकदा कठोर पावले टाकण्याचे संकेत दिले आहेत.

कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्यामुळे राज्यातील लॉकडाऊन अंतर्गत लावण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र, निर्बंध शिथिल झाल्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये बरे होणार्‍या कोरोना रुग्णांच्या संख्येपेक्षा नव्या रुग्णांची संख्या जास्त असल्याचे मागील दोन दिवसात आढळून येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने पुन्हा एकदा कठोर पावले टाकण्याचे संकेत दिले आहेत. येत्या आठ दिवसात पुन्हा निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे राज्याचे आपत्ती निवारण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी रविवारी येथे सांगितले.

कालची आकडेवारी पाहता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी आणि नवीन रुग्णांची संख्या अधिक होती. तरीही आजच यावर ठोस असे भाष्य करता येणार नाही. पुढचे आठ दिवस या परिस्थितीत काय बदल होतात ते पाहावे लागेल. सध्या काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या हळूहळू वाढत असल्याचे दिसत आहे. आपण सवलती व काही प्रमाणात सूट दिल्यानंतरचा हा बदल आहे. अशीच रुग्णसंख्या वाढत राहिली तर मात्र एकंदर स्थितीचा आढावा घेऊन अनेक निर्बंध नव्याने लावावे लागतील’, असे वडेट्टीवार म्हणाले. पुढच्या आठ दिवसांनंतर याबाबत पुढचे पाऊल उचलण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

कोरोना पॉझिटिव्हिटी रेट किती आहे आणि ऑक्सिजन बेड्स किती भरलेले आहेत त्या आधारावर स्तर निश्चित करून त्यानुसार सध्या निर्बंध लावले जात आहेत किंवा त्यात सूट दिली जात आहे. यासाठी पाच स्तर राज्य सरकारने निश्चित केले आहेत. राज्यातील जिल्हे आणि प्रमुख महानगरे यांची यात वेगवेगळी वर्गवारी करण्यात आलेली आहे. यानुसार पाच टक्क्यांपर्यंत कोरोना पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या अनेक जिल्ह्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या जिल्ह्यांतील बहुतांश व्यवहार सुरू झाले आहेत. मात्र, निर्बंधांमधील ही शिथिलता गर्दीला आमंत्रण देणारी ठरल्याचे पाहायला मिळत असून त्यातून रुग्णसंख्या थोड्याफार प्रमाणात वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच राज्य सरकारची चिंता वाढली असून निर्बंधांबाबत नव्याने विचार सुरू करण्यात आल्याचेच वडेट्टीवार यांच्या विधानावरून दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -