घरफोटोगॅलरीटेक्नॉलॉजीच्या काळात हरवले 'हे' खेळ

टेक्नॉलॉजीच्या काळात हरवले ‘हे’ खेळ

Subscribe

मोबाईल आणि लॅपटॉपच्या काळात आज आपल्याला एकमेकांबरोबर बोलायलादेखील वेळ नसतो. तर इतर खेळ खेळणं तर फार लांबच. मुंबई विद्यापीठाच्या इंडिया स्टडी सेंटर आणि बहिस्थ शिक्षण विभागाच्यावतीने प्राचीन खेळांचं प्रदर्शन नुकतंच मुंबई विद्यापीठात भरवण्यात आलं होतं. या प्रदर्शनात प्राचीन काळात खेळले जाणारे खेळ पाहायला मिळाले. त्याचबरोबर ते समजूनदेखील घेता आले. यामध्ये महाभारतापासून, मध्ययुगीन काळात खेळल्या जाणाऱ्या खेळांचा समावेश आहे.

अष्ट चम्मा

- Advertisement -

अष्ट चम्मा

दहाव्या शतकात ह्या प्रकारचा खेळ खेळला जायचा. या गेमला नवरा नवरी खेळसुद्धा संबोधलं जातं. फासा आणि सोंगटीच्या साह्याने हा खेळ खेळला जातो.

- Advertisement -

चौपार

चौपार 1

 

हा खेळ महाभारतापासून खेळला जायचा. जास्तीत जास्त ४ जण मिळून हा खेळ खेळतात. हा खेळ दुर्योधन आणि युद्धीष्ठीर या दोघांमध्ये खेळल्या गेला होता. शकुनीने यात वापरल्या जाणाऱ्या फाशांवर जादू केली होती, असं सांगितलं जातं. पांडव द्रौपदीला याच खेळात पणाला लावले आणि हरले.

साप शिडी –

साप शिडी

 

आठव्या शतकापासून सापशिडी हा खेळ खेळला जातो. आजही सापशि़डी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत खेळला जातो.

वाघ बकरी –

वाघ बकरी

हा खेळ मध्ययुगीन काळापासून खेळला जातो. ४ वाघ आणि १८ बकऱ्या या खेळात असतात. हा खेळ बुद्धिबळासारखा चाल खेळून केवळ दोन व्यक्तींमध्येच खेळला जातो. या दोन व्यक्तींमध्ये एक वाघ तर दुसरी व्यक्ती बकरी असते.

पालांगगुडी –

पालांगगुडी

 

हा खेळ चिंचोक्यांच्या मदतीने खेळला जातो. चोके गोळा करून दोन जण मिळून खेळला जातो. हा खेळ कोडं सोडविल्याप्रमाणे आहे ज्याच्याकडे जास्त चिंचोके राहतील तो खेळाडू खेळ जिंकतो.

काचपाणी –

काचपाणी

हे दोन्ही खेळ अगदी प्राचीन काळापासून खेळले जातात. यामध्ये काचपाणी हा खेळ महाराष्ट्राचा प्राचीन खेळ आहे ज्यामध्ये बांगडीच्या तुकड्याचा वापर करून एकमेकांवर ठेवले जातात आणि हे खेळ खेळताना बांगडीच्या तुकडे एक एक बाजूला केले जातात. मात्र हे करत असताना दुसऱ्या बांगडीचा तुकड्याला धक्का न खेळ खेळायचा असतो.

मिकाडू –

मीकाडू

 

हा खेळसुद्धा काचपाणीप्रमाणेच खेळतात. हा जपानी खेळ आहे. एकमेकांवर असलेल्या लाकडी काड्या बाजूला करताना दुसऱ्या काडीला धक्का लागू नये याची खबरदारी हा खेळ खेळताना घ्यावी लागते.

मोबाईल आणि लॅपटॉपच्या काळात आज लोक समोरासमोर बसून खेळायचे खेळ विसरले आहेत. तर हे खेळ खेळले जावेत. अधिकाधिक लोकांना माहिती व्हावेत या उद्देशाने पहिल्यांदाच हे प्रदर्शन इंडिया स्टडी सेंटर आणि बहिस्थ शिक्षण विभाग यांच्या वतीने राबविण्यात येत आहे.
मुग्धा कर्णिक, संचालक, बही:शाल विभाग, मुंबई विद्यापीठ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -