महाराष्ट्र काँग्रेसतर्फे आजपासून दोन दिवसाचे (ता. 16 फेब्रुवारी) चिंतन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. लोणावळ्यामध्ये राज्यस्तरीय चिंतन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला राज्यातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आणि आमदार उपस्थित आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या चिंतन शिबिराला उद्या (ता. 17 फेब्रु) नाना पटोले हे संबोधित करणार आहेत. त्यापूर्वी आज पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथसला यांच्यासह महत्वाच्या नेत्यांची भाषणे झाली.