घररायगडरायगड जिल्ह्यात ३१६३ शाळाबाह्य मुले; २४५१ मुलांना दिले शिक्षण हमी पत्र

रायगड जिल्ह्यात ३१६३ शाळाबाह्य मुले; २४५१ मुलांना दिले शिक्षण हमी पत्र

Subscribe

रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या काळात केलेल्या सर्वेक्षणात ४६० मुले जिल्ह्यात स्थलांतरीत होऊन आलेली आणि २७०३ मुले अन्य ठिकाणी स्थलांतरीत झालेली अशी एकूण ३१६३ मुले शाळाबाह्य आढळली आहेत. शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी शिक्षण विभागाने ही शोधमोहीम राबवली होती. २४५१ मुलांना शिक्षण विभागातर्फे शिक्षण हमी पत्र देण्यात आले असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. त्यामुळे त्या मुलांना शाळेत प्रवेश घेणे सोपे जाणार आहे.

अलिबाग: रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या काळात केलेल्या सर्वेक्षणात ४६० मुले जिल्ह्यात स्थलांतरीत होऊन आलेली आणि २७०३ मुले अन्य ठिकाणी स्थलांतरीत झालेली अशी एकूण ३१६३ मुले शाळाबाह्य आढळली आहेत. शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी शिक्षण विभागाने ही शोधमोहीम राबवली होती. २४५१ मुलांना शिक्षण विभागातर्फे शिक्षण हमी पत्र देण्यात आले असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. त्यामुळे त्या मुलांना शाळेत प्रवेश घेणे सोपे जाणार आहे.
मुलांचे पालक हंगामानुसार कामकाज करतात. त्यामुळे त्यांना एका गावातून दुसर्‍या गावाता नाईलाजास्तव स्थलांतरीत व्हावे लागते. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणामध्ये खंड पडतो. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाने शोध मोहिम राबवली होती. त्यामध्ये शाळा बाह्य मुले आढळल्याने शिक्षण विभागा सर्तक झाला आहे.
जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस आदींनी वीटभट्टी, रेल्वे स्टेशन, प्रत्येक गावातील गजबजलेल्या वस्त्या, कामगारांच्या वस्त्या, बाजारतळ, बांधकाम व्यवसायातील कामगार, तसेच रस्त्यावर राहणारे कुटुंब अशा ठिकाणी भेटी देऊन ६ ते १४ वयोगटातील बालके ज्यांनी अद्याप शाळेत नाव दाखल केले नाही किंवा ज्यांची शाळेतील अनुपस्थिती एक महिन्यापेक्षा जास्त आहे अशा बालकांचा शोध घेण्यात आला. दरवर्षीच ही मोहीम राबविली जाते. यावर्षी जुलैमध्ये राबविलेल्या मिशन झिरो ड्रॉप मोहीमेतही शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर अशी १५ दिवसांचे हे सर्वेक्षण जिल्ह्यात करण्यात आले. त्यात एकूण ३१६३ मुले-मुली शाळाबाह्य आढळली आहेत.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क अधिनियम २००९ नुसार वय वर्ष ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास मोफत व सक्तीचे शिक्षण घेण्याचा हक्क आहे. असे असले तरी राज्यात पालकांचे विविध व्यवसायाच्या निमित्ताने होणारे स्थलांतर व त्यामुळे मुलांच्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षणात खंड पडण्याची समस्या निर्माण होताना दिसत आहे. त्यातही मुलींचे प्रमाण वाढण्याची भीती जास्त आहे. स्थलांतर करणारी कुटुंबे ही आर्थिक स्तर निम्न असलेल्या वंचित सामाजिक गटातील, भूमीहीन अथवा अल्पभूधारक असतात. मोठ्या प्रमाणात ही कुटुंबे ऊसतोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्रात तर शेजारी असणार्या कर्नाटक व गुजरात राज्यात स्थलांतर करतात. हे स्थलांतर साधारणत: सप्टेंबर महिन्यात होत असते. तसेच वीटभट्टी, दगडखाण मजूर, कोळसा खाणी, शेतमजुरी, बांधकाम व्यवसाय, रस्ते, नाले, जिनिंग मिल आदी प्रकारच्या कामानिमित्त विविध कामगार स्थलांतर करीत असतात. त्यामुळे ही मुले शोधण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले होते.

रायगड जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात किती ?
रायगड जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात, राज्यात स्थलांतरित झालेल्या मुलांमध्ये २ हजार ७०४ शाळाबाह्य मुलांचा समावेश आहे . यामध्ये १३६७ मुले आणि १ हजार ३३७ मुलींचा समावेश आहे . तालुकानहिाय आकडेवारी अशी. अलिबाग तालुक्यात ३ मुली , कर्जत: ३५ मुले आणि २१ मुली, खालापूर: २७ मुले , १७ मुली , महाड: ६८ मुले , ५९ मुली , माणगाव: २६० मुले , २८४ मुली, म्हसळे: ७ मुले, ७ मुली , मुरूड: १९ मुले , १२ मुली , पनवेल:५ मुले , ५ मुली , पेण: १२४ मुले , १०३ मुली , पोलादपूर: १८ मुले , २६ मुली , रोहे: ५१ मुले , ३३ मुली, सुधागड: ७०८ मुले , ७३० मुली , श्रीवर्धन: २ मुले , १ मुलगी , तळे: १४ मुले , १४ मुली आणि उरण तालुक्यातील २९ मुले आणि २१ मुलींचा समावेश आहे .

- Advertisement -

पर राज्यातून, जिल्ह्यातून रायगड जिल्ह्यात किती?
दुसर्‍या राज्यातून , जिल्ह्यातून रायगड जिल्ह्यात स्थलांतरित झालेल्या मुलांमध्ये ४६० मुले शाळाबाह्य असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये २३२ मुले आणि २२८ मुलींचा समावेश आहे. तालुकानहिाय आकडेवारी अशी. अलिबाग तालुक्यात ९ मुले , ७ मुली , कर्जत: ३१ मुले आणि २४ मुली , खालापूर:१ मुलगी , महाड: २ मुले , १ मुलगी , माणगाव: १८ मुले , २२ मुली , म्हसळे: ३१ मुले , २७ मुली , मुरूड: ६ मुले , ७ मुली , पनवेल:२७ मुले , २४ मुली , पेण: २९ मुले , ३३ मुली , पोलादपूर: ६ मुले , ४ मुली , रोहे: ६ मुले , ४ मुली , श्रीवर्धन: ८ मुले , ४ मुली , तळे: १४ मुले , ८ मुली आणि उरण: ५० मुले आणि ६२ मुलींचा समावेश आहे.

शिक्षणासाठी प्रवेश घेणे सोपे जाणार
रायगड जिल्ह्यातून स्थलांतरित झालेल्या २ हजार ४५१ मुलांना शिक्षण विभागातर्फे शिक्षण हमी पत्र देण्यात आले आहे. तालुकानहिाय आकडेवारी अशी. यामध्ये कर्जत तालुक्यात १२ मुले , खालापूर: ३३ मुले , महाड: १०३ मुले , माणगाव: ४८५ मुले , म्हसळे: १४ मुले, पनवेल: १० मुले , पेण: १८४ मुले , पोलादपूर: ३६ मुले , रोहे: ७३ मुले , सुधागड: १ हजार ४३८ मुले , श्रीवर्धन: ३ मुले , तळे: २८ आणि उरण:३२ मुलांचा समावेश आहे. शिक्षण हमी पत्र स्थलांतरित झालेल्या मुलांना दिल्याने या मुलांना जेथे जातील तेथे शिक्षणासाठी प्रवेश घेणे सोपे जाणार आहे. तसेच सदरची मुले नियमीत शाळेत उपस्थिती लावतात का हे देखील शिक्षण विभागाला तपासावे लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -