घररायगडचिरनेरमध्ये एकाच दिवशी तिघांचा मृत्यू , जनतेत घबराट

चिरनेरमध्ये एकाच दिवशी तिघांचा मृत्यू , जनतेत घबराट

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत असून, विवाह समारंभ, तसेच धार्मिक कार्यक्रमांतून होत असलेल्या गर्दीकडे प्रशासन आणि पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. ग्रामीण भागातील मृत्यूचा दर देखील मोठा आहे. चिरनेर गावात बुधवारी एकाच दिवशी तीन व्यक्तींचा मृत्यू झाल्याने घबराट पसरली आहे.

काही दिवसांपासून चिरनेर गावात दररोज कोणत्या तरी कारणामुळे एक व्यक्ती तरी दगावत आहे. गावात बुधवारी झालेल्या मृत्यूपैकी दोन मृत्यू हे कोरोनाने, तर एका व्यक्तीच्या मृत्यूचे कारण समजू शकले नसले तरी त्याच्या घरातील काही व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे बोलले जाते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि मृत्यूमूळे येत्या शुक्रवारपासून गावामध्ये कडक निर्बंध लावले जाणार आहेत. त्यामुळे कोणत्याही विवाह कार्यामध्ये गर्दी करू दिली जाणार नाही.

- Advertisement -

तसेच विनाकारण फिरणार्‍या व्यक्तींवर, विना मास्क फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. बाहेरील अनोळखी व्यक्तींना गावात प्रवेश दिला जाणार नाही. मेडिकल स्टोअर्स, दूध डेअरी, किराणा दुकान यांच्यावर देखील वेळेचे निर्बंध घालण्यात येणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -