घररायगडकेवळ मातीचा भराव टाकून वीहूर पुलाचे काम, वाहतुकीचा प्रश्न होणार गंभीर

केवळ मातीचा भराव टाकून वीहूर पुलाचे काम, वाहतुकीचा प्रश्न होणार गंभीर

Subscribe

मुरुड हे पर्यटन स्थळ असल्याने येथे हजारोच्या संख्येने गाड्यांची वाहतूक सुरू असते. त्यामुळे या पुलाच्या संरक्षक भिंतीला फक्त फक्त माती भराव कितपत टिकाव धरणार याचा सवाल समस्त ग्रामस्थ करीत आहेत.

मुरुड – मुंबई रस्त्यावर असणारा वीहुर पुल २७ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे वाहून गेला होता. या पुलास असणारी दगडी संरक्षक भिंत मातीसह वाहून गेल्याने त्यावेळी पुलावरून काही दिवस वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. वाहतुकीसाठी हा पुल अत्यंत महत्वाचा आहे. मात्र, मुरुड सार्वजनिक बांधकाम खात्याने पुलाचे अत्यंत जुजबी काम करून आपली जबाबदारी झ्टकण्याचे काम केले आहे. पुलाची माती व दगड टिकून राहण्यासाठी सिमेंट काँक्रीटची संरक्षक भिंत आवश्यक असताना केवळ मातीचा भराव टाकून हे काम आटोपते घेतले आहे

या संरक्षक भिंतीला दगडही लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पुढील पावसात ही माती वाहून जाऊन पुन्हा तोच प्रश्न ऐरणीवर येणार आहे. फक्त मातीचा भराव टाकून सार्वजनिक बांधकाम खात्याने आपली जबाबदारी झ्टकुन टाकल्याने आता या पुलाचे काम होणार तरी कधी हा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -

मुरुड हे पर्यटन स्थळ असल्याने येथे हजारोच्या संख्येने गाड्यांची वाहतूक सुरू असते. त्यामुळे या पुलाच्या संरक्षक भिंतीला फक्त फक्त माती भराव कितपत टिकाव धरणार याचा सवाल समस्त ग्रामस्थ करीत आहेत. चिकणी व विहुर पुल २७ जुलैच्या पावसात वाहून गेला. या घटनेलासहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनही हे दोन्ही पुल पूर्ण करण्यात आलेले नाही. या दोन्ही पुलाबाबत येथील कार्यकारी अभियंता यांना विचारणा केली असता दोन्ही कामे टेंडर प्रक्रियेत असून सिमेंट काँक्रिटची संरक्षक भिंत बांधणार असल्याचे त्यावेळी सांगितले होते. परंत,ु प्रत्यक्षात मात्र मातीचा भराव टाकला गेल्याने पावसाळ्यात हा भराव वाहून जाणार असून पुन्हा वाहतूक थांबावी लागणार आहे. दोन्ही पुलाचे काम सुरुवातीपासून खूप हळूहळू करण्यात येत होते. आजतागायत या कामाने कधीही वेग घेतला नाही. त्यामुळे नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -