राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM eknath shinde) यांनी पुढाकार घेतल्याने ठाणे शहर वासियांना मोठा दिलासा मिळणार आहे. ठाणेकरांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. ठाणे शहरातील नागरिकांना १ ऑगस्ट पासून ५० एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यहात येणार आहे. राज्याच्या जलसंपदा विभागाने ठाणेकरांना अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळे ठाणे(thane) शहरवासियांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच एक बैठक घेतली होती. त्या बैठकीत ठाणे जिल्ह्यातील पाण्याच्या प्रश्नावर आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी ही बैठक सह्याद्री या अतिथीगृहात आयोजित केली होती.
हे ही वाचा – आम्हाला श्रेयवादात पडायचं नाही, सर्वांच्या मेहनतीने ओबीसी आरक्षण मिळालं- एकनाथ शिंदे
या बैठकीत त्यांनी राज्याच्या जलसंपदा विभागाला ठाणे शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले होते. यानुसार राज्याच्या जलसंपदा विभागाने अतिरिक्त ५० एमएलडी पाणी ठाणे शहराला देण्यास मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे ठाणे शहराला मोठा दिलासा मिळाला आहे. खरतर ठाणे शहराचा वेगाने विस्तार झाला आणि त्यामुळे विस्तारित ठाणे(thane) शहराला पाणी पुरवठा करताना ठाणे महानगरपालिकेला मोठी कसरत करावी लागत होती. मात्र आता हे पाणी मिळाल्यामुळे पालिकेला आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
हे ही वाचा – शिंदे – फडणवीसांना मंत्रिमंडळ विस्तार करता येणार नाही;काँग्रेसचा दावा
ठाणे शहराला दररोज ४८५ दशलक्ष मिलिलिटर एवढ्या प्रमाणावर पाणीपुरवठा करण्यात येतो मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे तो देखील अपुरा पडू लागला होता. मध्य वैतरणा जलाशयाची उंची वाढवण्यात आल्याने जास्त पाणी अडवणे शक्य होत असल्याने आता ठाणे शहराला १०० एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी ठाणे महानगरपालिकेने मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत जलसंपदा विभागाकडे केली होती. या मागणीला अनुसरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे पाणी तातडीने देण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिले होते.
त्यानुसार ठाणे शहराची तातडीची गरज भागवण्यासाठी जलसंपदा विभागाने ५० एमएलडी पाणी येत्या १ ऑगस्ट पासून ठाणे शहराला देण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री(CM eknath shinde) पदाचा भार स्वीकारल्यानंतर ठाणे शहराला पहिली मोठी भेट दिली आहे.
हे ही वाचा – वर्तकनगरमधील अनधिकृत दुकानांवर कारवाई