घरठाणेगुरुवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

गुरुवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

Subscribe

ठाणे । महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरूत्व वाहिनीचे कटाई नाका ते शीळ टाकी येथे तातडीचे दुरूस्तीचे काम हाती घेतल्यामुळे गुरुवार 18 एप्रिल 2024 रात्री 12.00 ते शुक्रवार 19 एप्रिल 2024 रात्री 12.00 वा. पर्यत असा एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद राहील. या शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. 26 व 31 चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभागसमितीमधील सर्व भागामध्ये आणि वागळे प्रभागसमिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. 2, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. या कपातीच्या कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीने करुन ठाणे महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन नागरिकांना महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.

ऐन कडक उन्हाळ्यात ठाण्यात पाणीपुरवठा बंद
ठाणे महापालिका क्षेत्रात मुंब्रा, कळवा, माजिवडा, मानपाडा आणि वागळे (काही भागात) प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. या पाण्याच्या टाकीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने दिवा, कळवा, मुंब्रा परिसरातील नागरिकांचे प्रचंड हाल होणार आहेत. अशा वेळी खर्‍या अर्थाने ठाणे महानगरपालिकेने अतिरिक्त पाणीपुरवठा साठवून ज्या वेळी आपत्कालीन परिस्थिती उद्भवेल अशावेळी टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा करणे आवश्यक आहे.
पाणी पुरवठा दुरुस्तीच्या कामासाठी बंद असतो, तसेच दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर टप्प्याटप्प्याने नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येतो. अशा वेळी दिवा परिसरातील नागरिकांना पाणीच मिळत नाही, म्हणजे गुरुवारी पाणी पुरवठा बंद झाला कि थेट शनिवार किंवा रविवारपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -