घरदेश-विदेशकाश्मीरमध्ये 'जैश'चे दहशतवादी; देशातील १५ शहरांत हायअलर्ट जारी

काश्मीरमध्ये ‘जैश’चे दहशतवादी; देशातील १५ शहरांत हायअलर्ट जारी

Subscribe

जैश-ए-मोहम्मदच्या सात दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला करण्याच्या उद्देशानं जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी केल्याची माहिती समोर येत आहे.

जैश-ए-मोहम्मदच्या सात दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला करण्याच्या उद्देशानं जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी केल्याची माहिती समोर येत आहे. इंग्रजी वृत्तपत्र टाईम्स ऑफ इंडियाने गुप्तचर विभागातील सूत्रांच्या हवाल्याने याबद्दलचे वृत्त दिले आहे. घुसखोर दहशतवादी ईद किंवा स्वातंत्र्य दिनाच्या आधी मोठा घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असल्याचेही वृत्तात म्हटले आहे. त्यामुळे मुंबई आणि दिल्लीसह देशातील १५ मोठ्या शहरांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, पुणे आणि दिल्लीसह देशातील महत्वाच्या शहरांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. महत्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या आठवड्यात दोन मोठे सण असून त्यादरम्यान दहशतवादी भारतात हल्ला करण्याची शक्यता असल्यामुळे तपास यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

बकरी ईदच्या निमित्ताने देशात मोठ्या घातपाताची शक्यता असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणेने (आयबी) दिला आहे. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरबाबत घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर हा अलर्ट महत्त्वाचा समजला जात आहे. भारतात दहशतवादी हल्ला घडवण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने जैश-ए-मोहम्मदला हिरवा कंदील दाखवला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादी घोषित करण्यात आलेला मसूद अजहर जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या आहे. जास्तीत जास्त जीवितहानी होईल अशा भागांमध्ये हल्ले करा, अशी सूचना आयएसआयकडून जैशला करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. घुसखोर दहशतवादी एखाद्या मशिदीवर हल्ला करू शकतात. त्यामुळे पाकिस्तानला भारतावर आरोप करण्याची संधी मिळेल, असा अंदाज सुरक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, जैशच्या सात दहशतवाद्यांनी बनिहालच्या दक्षिण आणि पीर पंजालच्या पर्वतील भागातून घुसखोरी केली आहे. सध्या हे दहशतवादी राजौरी किंवा पूँछमध्ये लपले असावेत, अशी शक्यता एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. ‘सात दहशतवादी अनंतनाग हायवे आणि त्याच्या आसपासच्या भागात हल्ले घडवू शकतात. त्यांच्याकडून नागरी वस्त्या आणि सुरक्षा दलांची कार्यालयं लक्ष्य केली जाऊ शकतात,’ असा अंदाज दक्षिण काश्मीर दलातील सूत्रांनी वर्तवला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -