घरदेश-विदेशकाश्मीर-पाकच्या गोळीबारात महाराष्ट्राचा पुत्र शहीद

काश्मीर-पाकच्या गोळीबारात महाराष्ट्राचा पुत्र शहीद

Subscribe

गोळी लागल्यानंतर त्यांना जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांनी आपले प्राण गमावले

भारत-पाक सीमेवर पाकिस्तानच्या लष्कराकडून झालेल्या अतिरेक्यांच्या गोळीबारात नायब सुभेदार सुनील रावसाहेब वाल्टे शहीद झाले आहेत. भारत-पाकिस्तान सीमेवर नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार सुरू असताना त्याला चोख प्रत्युत्तर देत असताना या महाराष्ट्राच्या पुत्राला वीरमरण आले. त्यांचे वय ४० असून मूळचे अहमदनगरमधील दहिगाव गावचे निवासी होते. त्यांच्या मागे पत्नी आई, वडील, मुलगी आणि मुलगा असे त्यांचे कुटुंब आहे. जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात भारतीय हद्दीत घुसखोर झालेल्या दहशतवाद्यांचा शोध आजही सुरू आहे.

नायब सुभेदार सुनील वाल्टे यांनी सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर ५ वर्षांची मुदत वाढवून घेतली होती. पुढच्या काही दिवसांमध्येच ते सेवानिवृत्त होणार होते. मात्र या झालेल्या गोळीबारात त्यांनी आपले प्राण गमावले. गोळी लागल्यानंतर त्यांना जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांनी आपले प्राण गमावले. उद्या गुरूवारी त्याच्या मुळगावी कोपरगावच्या दहीगाव बोलका येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -