घरदेश-विदेशमल्ल्याचं प्रत्यार्पण होणार? तिहार जेल सुरक्षेवर शिक्कामोर्तब

मल्ल्याचं प्रत्यार्पण होणार? तिहार जेल सुरक्षेवर शिक्कामोर्तब

Subscribe

ब्रिटन कोर्टाने मॅच फिक्सिंगचा आरोपी संजीव चावलाच्या खटल्यात दिलेला हा निर्णय विजय माल्ल्याच्या भारत प्रत्यार्पणासाठी महत्त्वाचा ठरु शकतो. तसेच माल्ल्याचा प्रत्यार्पणाचा मार्ग यामुळे मोकळा होण्याचीही शक्यता आहे.

भारतातील बँकांमध्ये सुमारे १० हजार कोटींचा घोटाळा करुन लंडनमध्ये फरार झालेला उद्योगपती- विजय मल्ल्याला ब्रिटन हायकोर्टाने मोठ दणका दिला आहे. ब्रिटन कोर्टाने दिल्लीतील तिहार जेल सुरक्षित असल्याचे सांगत भारतातून फरार झालेल्याचे तिथे प्रत्यार्पण होऊ शकते असे सांगितले आहे. भारतातील बँकांना चुना लावणाऱ्या विजय माल्ल्याने याआधी भारतातील जेल असुरक्षित असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळेच ब्रिटन कोर्टाने मॅच फिक्सिंगचा आरोपी संजीव चावलाच्या खटल्यात दिलेला हा निर्णय विजय माल्ल्याच्या भारत प्रत्यार्पणासाठी महत्त्वाचा ठरु शकतो. तसेच माल्ल्याचा प्रत्यार्पणाचा मार्ग यामुळे मोकळा होण्याचीही शक्यता आहे.

लंडन हायकोर्टाने दिला निर्णय

लंडन हायकोर्टाचे न्यायाधीश लेगाट आणि न्यायाधीश डिंगेमॅन्स यांच्या खंडपीठाने शुक्रवारी हा निर्णय दिला. तिहार जेलमध्ये असलेले भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक संजीव चावला यांच्या जीवाला तिहार जेलमध्ये कोणताही धोका नाही असे म्हटले आहे. संजीव चावला यांच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच फिक्सिंगचा आरोप आहे. ही हैंसी क्रोन्ये मॅच फिक्सिंगचे प्रकरण आहे. माजी क्रिकेटर अजय जडेजा आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्यासह संजीव चावला यांची देखील या मॅच फिक्सिंगमध्ये नावे आहेत.

- Advertisement -

माल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा?

भारताकडून संजीव चावलाच्या उपचारासाठी भरवसा मिळाल्यानंतर लंडन हाय कोर्टाने हे मत व्यक्त केले आहे. लंडन हायकोर्टाच्या या निर्णयाचा प्रभाव विजय मल्ल्याच्या प्रकरणावर देखील पडू शकतो. कारण विजय मल्ल्या नेहमी भारतातील कारागृहांना असुरक्षित असल्याचा दावा करत आला आहे. ब्रिटन हायकोर्टाच्या या निर्णयाने विजय माल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -