युसूफ मेहरअली सेंटर, पनवेल येथील अभिनय कार्यशाळेत व्यक्ती आणि कलाकार यांना जोडण्याच्या, घडवण्याच्या प्रक्रियेत आलेले अनुभव
जूनचा पहिला आठवडा…
कडक ऊन आणि गर्मीच्या दुपारनंतर संध्याकाळी, थिएटर ऑफ रेलेवन्स अभिनय कार्यशाळेत एक व्यक्ती ‘राजगती’ नाटकाच्या सकारात्मक प्रभावाने प्रभावित होऊन देशाच्या स्थितीला आपण कसे बदलू शकतो या हेतूने भेटायला आले होते. त्यांनी त्यांच्या अपेक्षा सांगितल्या आणि मी एका मागोमाग एक त्यांच्या अपेक्षांनुसार त्यांना आपली सैद्धांतिक प्रस्तावना व नियोजनाची कार्यसूची प्रस्तावित करत होतो. जवळजवळ तासभराच्या वैचारिक मंथनाने माझ्या आतील वातावरण तरंगीत होत गेले..
चर्चा संपल्यानंतर जेव्हा मी चारीबाजूला न्याहाळले त्यावेळी संध्याकाळ सावळी नाही सोनेरी झाली होती. सोनेरी वातावरण सर्वत्र पसरले होते. वातावरण बदलले होते, दमट असूनदेखील थंड वाटत होते. सोनेरी संध्याकाळ असूनही सर्व स्वच्छ दिसत होते. त्यावेळी मी समूहाला म्हणालो, चला चैतन्य अभ्यासाला जाऊया. आम्ही सारे त्वरित चैतन्य अभ्यासासाठी निघालो. इतर जीवजंतूना लक्षात घेत आम्ही शेतात पोहोचलो. जंगल आणि छोट्या टेकडीच्या कुशीत असलेले शेत धान्य कापणीनंतर तापले होते, सुकलेल्या जमिनीला भेगा पडल्या होत्या आणि जमीन पावसाची वाट पाहत आकाशाला न्याहाळत होती. सुकलेले गवतदेखील सोनेरी संध्या प्रकाशात चमकत होते. मी माझ्या पूर्ण प्रवाहात राजनैतिक चर्चेत आलेला अनुभव, समूहासोबत वाटण्यासाठी उत्साहित होतो. अनुभव सांगण्याची उत्कंठा होती.
समूहातील एका सदस्याला मी विचारले, सांग या शेतात तुला काय दिसते आहे? सदस्य माझ्या चेतनेच्या तरंगाबाहेर होता. आमची wave length जुळली नाही. समूहातील बाकी सदस्यांची चेतना जागृत झाली. असमंजस, भीती अनोखेपण हे भाव आणि कुतूहल सर्वांच्या नजरेत होते. माझ्या कलात्मक तरंगांना समूहातील सहभागींसोबत जोडता न आल्यामुळे माझ्या तरंगीत आवेगावर पाणी फेरले गेले.
आकाशात वीज चमकताना जाणवली आणि मी समूहाला म्हणालो, चला परत जाऊया समूहाच्या सदस्यांनी धैर्य एकवटून थोडावेळ थांबण्याचा आग्रह केला, मी मौन स्वीकृती दिली आणि आम्ही शेतामध्ये जंगलाच्या दिशेने पुढे चालू लागलो. समूह स्वतःला सांभाळत, कुजबूजत चालला होता. मी माझ्या उर्जेला परिवारासोबत फोनवर संवाद करून परावर्तित केले. पाच दहा मिनिटांनंतर मी पुन्हा समूहासोबत जोडलो गेलो, तरंगित आवेग (मनाची एक स्थिती) कायम होता; पण मन शांत धीरगंभीर होऊन संप्रेषण यंत्रांच्या शोधात होते. मी स्वतःला निसर्गात सोडले आणि आम्ही सारे शेतात बसलो.
मी सर्वांना सजग करत म्हणालो, निसर्ग केवळ आपल्यासाठीच नाही, तर इतर जीवजंतूही आहेत, भेगाळलेल्या जमिनीत कुठला प्राणी लपलेला असू शकतो, जरा सावध होऊन बसा. सर्व सजग व सहज अवस्थेत, माझ्या तरंगांसोबत जोडण्यासाठी आपले तरंग शोधत होते. सोनेरी संध्याकाळ आपला रंग बदलत होती…आणि हळूहळू रात्र होऊ लागली. वातावरण दमट होते तरी गार वाटत होते… वाढत्या अंधारात समूहातील एक सदस्य उत्साहाने ओरडली काजवा, कुतूहलाच्या तरंगांनी संपूर्ण समूहाला घेरले..क्षणार्धातच आमच्या चहूबाजूंच्या झाडांवर असंख्य काजवे लखलखत होते. समूहातील सदस्यांच्या अपेक्षा आणि स्वप्नेदेखील त्यांच्या मनात काजव्यांप्रमाणे चमकू लागले. हजारो काजवे बाहेर तर हजारो इच्छा काजव्यांप्रमाणे सर्वांच्या आत झगमगत होत्या. या इच्छांची चमक तरंगीत होऊन संपूर्ण समूहाच्या कलात्मक तरंगांना चमकवीत होती !
येथे एक पैलू हा आहे की, चार वर्षांपूर्वी, नाटक अनहद नाद नाटकाच्या पहिल्या प्रस्तुतीआधी
काजवे एका झाडावर दिसले आणि आज चार वर्षांनंतर .. आश्चर्यकारक .. अलौकिक अनुभव…
create, radiate and resonate
ज्ञान आणि अज्ञान (मूर्खपणा) चा संघर्ष, व्यक्तिच्या संप्रेषण क्षमतेची मर्यादा, व्यक्ती होण्याच्या अधिकाराचा सन्मान, कलात्मक सिध्दी आणि अपेक्षा, कलाकार आणि त्याची कलेतून स्वतःला कोरून आकार देण्याची प्रतिबद्धता. या सगळ्यांमध्ये तरंगणार्या आणि जूनच्या उष्मीत वातावरणात होरपळून जाणार्या कार्यशाळेत व्यक्ती आणि कलाकाराच्या आयमांना मंथन करण्याची प्रकिया सुरू होती. कलाकाराकडून सतत आपल्या व्यक्तितल्या खोटेपणाला वेगवेगळ्या अभिनयाच्या पद्धतीने लपवण्याचा प्रयत्न सुरू होता. व्यक्तितल्या कमजोरीला लपवण्याचे असफल प्रयत्न. प्रत्येक प्रयत्न ना व्यक्तीला स्पर्श करत होता आणि ना ही कलाकाराचा विश्वास पक्का करत होता.
यामध्येच कार्यशाळेतील दोन दिवस निघून गेले. कलाकार रंगमंचाच्या मध्यभागी, मी समोर बाकी सहभागींसोबत प्रेक्षकांसारखा बसलो आहे… कलेच्या नावाखाली पाखंड होत आहे हे बघून माझा राग प्रचंड वाढत होता. फक्त एक क्षण धैर्याने मला सांभाळून ठेवले होते. मनात येत होतं की मी या कलाकाराचे दगडाप्रमाणे तुकडे तुकडे करून टाकू, खूप प्रहार करू, मातीसारखं एक एक कण वेगळा करून, त्या मातीला रगडू आणि मग त्यात सत्वाचे अमृत मिसळून त्याला एकरूप करू आणि त्यातून एका सात्विक व्यक्ती आणि कलाकाराला आकार देऊ. हे मनन करता करता रागाने माझ्या पूर्ण मेंदूला व्यापले आणि अचानक निद्रावस्था मला माझ्या अर्धचैतन्य अवस्थेत घेऊन गेली. मी बसल्या बसल्या स्वतःच्या जागेवर थोड्या वेळासाठी झोपून गेलो.
दुसर्याच क्षणी कलात्मक तरंगातल्या विश्वाने मला सामावून घेतले. मंचावर कलाकार स्तब्ध, शिथिल आणि मूढ, जड अवस्थेत… अगदी मंचाच्या मध्य भागी… माझ्यातल्या तरंग विश्वाने त्याला स्पर्श केले आणि जे मी रागाच्या मानसिकतेत विचार करत होतो.. त्या कल्पनेला कलाकार परफॉर्म करू लागला. त्याने मंचाला आपल्या पाच प्रतिमाप्रमाणे पाच भागांत विभागले. एक अभिनय, चित्रकार, गायक, व्यक्ती आणि साधना स्थळ. प्रत्येक भागाची प्रतिमा म्हणजे छबीला उचलले.. एकत्र ठेवले त्यांना तोडले, प्रहार केला आणि एक एक कण वेगळा केला, मग त्यात पाणी मिसळून त्याला एकरूप केले.. त्या मिश्रणाला चाकावर ठेवले आणि त्याचे एक मडके बनवले. त्या मडक्याला उचलून मंचाच्या मध्यभागी आणले आणि आगीवर ठेवले.
स्वतःची ध्यान साधना करत आपल्या व्यक्तीतील सद्विवेक बुद्धीच्या भट्टीत तापवले. मडकं मजबूत झाल्यावर म्हणजेच व्यक्तीच्या विवेकाचा पाया रचून त्यावर आपल्या व्यक्तित्वाला घडवत कलाकाराने कला सत्वातून प्रेक्षकांना अभिभूत केले. जेव्हा माझी कलात्मक तरंग कलाकाराला स्पर्श करत होती तेव्हा मी मध्ये मध्ये डोळे उघडून पाहत होतो की, कलाकार मला बघण्यात गुंग तर नाही झाला.. पण कलाकाराने कलात्मक सिद्धीला जगत कलात्मक आनंदाने आपल्या विखंडित झालेल्या व्यक्ती आणि कलाकाराच्या दोन टोकांना जोडले होते. प्रस्तुतीनंतर सर्व सहभागींनी आपला अभिप्राय दिला. प्रत्येकाला connection जाणवले. मी सगळ्यांना विचारले की हे तर तुम्ही पाहिले.. पण ते सांगा जे प्रस्तुती बघताना तुमच्या आत घडत होते.. म्हणजे तुम्ही काय पाहिले ते वेगळे.. बघताना तुम्हाला काय होत होतं ते वेगळं.. मग मी प्रस्तुती बघताना माझ्या आत जे घडत होते ते सर्वांना सांगितले.. माझा प्रवास, कलात्मक तरंग भावाची हुबेहूब जाणीव आणि त्यापासून उत्प्रेरित होण्याची प्रकिया व त्याचा पुरावा कलाकाराने जेव्हा सांगितला, तेव्हा सगळे अवाक झाले. कला साधनेत चैतन्य-अर्धचैतन्याच्या कलात्मक तरंग आणि त्याचे सृजन, विकिरण आणि गुंजन …सृजनकार म्हणून create, radiate and resonate चे हे अद्भूत अनुभव अनुभवले !