घरमहाराष्ट्रहे तर आदिवासींचे आंदोलन - फडणवीस

हे तर आदिवासींचे आंदोलन – फडणवीस

Subscribe

हे ढोंगी सरकार आहे, मुंबईत आलेल्या आदिवासींच्या आंदोलनाला शेतकर्‍यांचे आंदोलन सांगून आदिवासींची दिशाभूल करत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कृषी कायद्यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील शेतकर्‍यांना त्यांचा अधिकार देऊ पाहत आहेत. मात्र, काही ढोंगी लोक या शेतकर्‍यांची दिशाभूल करत आहेत, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबईत आलेला मोर्चा हा आदिवासींचा आहे. ते सोमवारी भंडारा येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.

आजचा मोर्चा पाहून सरकारचे डोळे उघडलेत. एवढे लोक सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहे. मला कोणी विचारले ठाकरे सरकारची सर्वात प्रभावी योजना कोणती तर माझे उत्तर आहे, माल कमवा. वाळू, दारू आणि इतर अनेक बाबतीत हे सरकार भ्रष्टाचार करत आहे. आम्ही कधीच धान खरेदी थांबविली नाही, कधीच धान उत्पादक शेतकर्‍यांचे पैसे थकविले नाही. मात्र, हे सरकार धान खरेदीत भ्रष्टाचार करत आहेत. याची चौकशी झाली तर काँग्रेस, राष्ट्रवादीचे अर्धे नेते जेलमध्ये जातील, असे टिकास्त्र फडणवीसांनी सोडले.

- Advertisement -

वीज ग्राहकाला सूट नाही; पण बिल्डर्सवर मेहरबानी
गरीब वीज ग्राहकाला सूट देण्यात किती कोटी लागतात? अरे तुम्हीच गरिबांना, शेतकर्‍यांना वीज बिलात सूट देण्याची घोषणा केली होती. गरिबांना वीज बिलात सूट न देणारे हे सरकार मुंबई, पुण्यातील बिल्डर्सला 5 हजार कोटीचे प्रीमियम देते. तिन्ही पक्षाचे मंत्री त्या पैशाची वाटणी करून घेतात. माझे एवढे, तुझे तेवढे अशी वाटणी मंत्री करून घेतात, असे गंभीर आरोप फडणवीस यांनी केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -