घरमहाराष्ट्रचौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही

चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही

Subscribe

ईडीचा फेरा !

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) एकाचवेळी दोन नेत्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारल्याने देशभर एकच खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपवर आरोपाची राळ उडवणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कोहिनूर स्क्वेअर खरेदी व्यवहारात मनिलॅण्डरिंगच्या कथित आरोपावरून २२ तारखेला ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहण्याची नोटीस पाठवली आहे. तर दुसरीकडे आयएनएक्स मीडिया घोटाळ्यातील प्रमुख आरोपी म्हणून माजी केंद्रिय मंत्री पी. चिदंबरम यांना ईडी आणि सीबीआयने बुधवारी रात्री ९.३० वाजता ताब्यात घेतले. या दोन्ही नेत्यांविरोधात सत्ताधारी भाजपने जाणीवपूर्वक आणि आकसाने ही कारवाई केल्याचा आरोप विरोधीपक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेने केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर स्क्वेअरप्रकरणी ईडीने नोटीस बजावल्याने एकच खळबळ उडाली आहे. राज यांना गुरूवारी २२ ऑगस्टला चौकशीकरता ईडीच्या मुंबई कार्यालयात बोलावले आहे. राज यांच्या समर्थनार्थ सर्व मनसैनिक एकवटले असतानाच आता त्यांचे चुलत बंधू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील राज यांना या प्रकरणी क्लिन चिट दिली आहे. ईडीच्या चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केले. उध्दव यांच्या या वक्तव्यामुळे भाजपबरोबरच नोटीस बजावणार्‍या इडीवरही दबावाची शक्यता निर्माण झाली आहे.

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ED ने नोटीस दिल्यानंतर याबाबत अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा याबाबत भाष्य केले आहे. काँग्रेसच्या बंडखोर आमदार निर्मला गावित आणि राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी राज ठाकरेंच्या ईडी कारवाईबाबत उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला असता राज यांच्या ईडीच्या चौकशीतून काहीही साध्य होणार नाही, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. मात्र यावर अजून काही बोलण्याचे उद्धव यांनी टाळले.

भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाबाबत मौन
यावेळी उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या शिवसेनेत परतीबाबतच्या बातम्यांबद्दल विचारले असता उद्धव ठाकरे यांनी या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले. दरम्यान ईडीच्या चौकशीने काहीच साध्य होणार नाही, असे सांगून उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंची पाठराखण केली आहे. उद्या राज ठाकरे ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाणार आहेत.

- Advertisement -

प्रवीण चौगुलेच्या आत्महत्येने राज ठाकरे व्यथित
ईडीच्या नोटिसीचा आदर करूया, २२ ऑगस्टला शांतता राखा, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस टाळा, सामान्य जनतेला त्रास होणार नाही याची काळजी घ्या आणि ईडीच्या कार्यालयाजवळ जमू नका, असे जाहीर आवाहन पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी ट्विटरवरून मनसे कार्यकर्त्यांना केले आहे. मात्र बुधवारी ठाण्यात मनसेचा निष्ठावंत कार्यकर्ता प्रवीण चौगुलेने राज यांना ईडीने नोटीस पाठवल्याने स्वताःला जाळून घेत आत्महत्या केली आह

राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवरून मनसेच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची आत्महत्या
या धक्कादायक घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटर अकाऊंटवरून प्रवीणच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच, ‘आपला सहकारी प्रवीण चौगुले ह्याच्या निधनाच्या बातमीने माझं मन व्यथित झालं आहे. मला ईडीची नोटीस आली, ह्या बातमीने अस्वस्थ होऊन प्रवीणने आत्मदहनासारखा टोकाचा मार्ग निवडला. हे व्हायला नको होतं.’, असे देखील म्हटले आहे.

प्रवीण हा राज ठाकरेंचा प्रचंड चाहता होता. तो मनसेचा निष्ठावंत कार्यकर्ता होता. त्यामुळे मनसेचा कोणताही कार्यक्रम असो किंवा आंदोलन असो, तो स्वतःच्या शरीरावर मनसेचा झेंडा रंगवून कार्यक्रमात सर्वात पुढे असायचा. प्रवीणच्या जाण्याने मनसेने फार मोठा निष्ठावंत कार्यकर्ता गमवला आहे. यावेळी राज ठाकरे असे म्हणाले की, ‘प्रवीणचं जसं माझ्यावर, पक्षावर प्रेम होतं तसंच तुम्हा सगळ्यांचं माझ्यावर, आपल्या पक्षावर मनापासून प्रेम आहे ह्याची मला जाणीव आहे. पण माझी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे की कोणीही टोकाचं पाऊल उचलू नका. ह्या आधी देखील अनेक कठीण प्रसंगांमधून आपण बाहेर पडलो आहोत त्यामुळे तुम्हा सर्वांच्या प्रेम आणि विश्वासाच्या जोरावर आपण ह्या प्रसंगावर देखील मात करू हे नक्की.’

कोणत्याही कृतीने सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या
‘ईडी’कडून कोणत्याही प्रकारची चौकशी किंवा काही प्रश्न विचारायचे असल्यास त्यांनी योग्य ती उत्तरं देईन, असे राज ठाकरे यांनी सगळ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगितले आहे. ‘तुम्ही सर्वांनी शांतता राखा आणि उद्या ईडीच्या कार्यालयाजवळ कोणीही येऊ नका. कालच्या माझ्या सूचनेनंतर देखील अनेक जण ईडीच्या कार्यालयाजवळ येण्याचा विचार करत आहेत असं मला कळलं, तुमचं खरंच माझ्यावर प्रेम असेल तर तुम्ही तिथे येणार नाही. काल मी जे सांगितलं तेच पुन्हा सांगतो तुमच्या कुठल्याही कृतीने सर्वसामान्य माणसांना कोणताही त्रास होणार नाही अथवा सार्वजनिक अथवा खाजगी मालमत्तेचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या, अशी विनंती राज ठाकरेंनी केली आहे. बाकी ह्या विषयावर जे बोलायचं आहे ते मी योग्य वेळी बोलेनच. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची नीट काळजी घ्या, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -