घरमहाराष्ट्रमुंबईचा अवमान करणाऱ्या 'त्या' उपऱ्या व्यक्तीविरोधात सभागृहात आवाज उठवा

मुंबईचा अवमान करणाऱ्या ‘त्या’ उपऱ्या व्यक्तीविरोधात सभागृहात आवाज उठवा

Subscribe

शिवसेना खासदार संजय राऊत आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत यांच्यातील वाद शांत होण्याचं नाव घेत नाही आहे. कंगणाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर राज्याभरातून तिच्यावर टीका झाली. संजय राऊत यांनी कंगनाला जोरदार प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, आता कंगनाने केलेल्या विधानांचा समाचार घेत शिवसेनेने ‘सामना’मधून टीकास्त्र डागलं आहे.

कंगनाने मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचं विधान केलं होतं. यावर संजय राऊत यांनी कंगनाला उत्तर सणसणीत उत्तर दिलं. त्यानंतर कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर अशी केली. यानंतर कंगनाविरोधात संतापाची लाट उसळली. कंगनानं मुंबई पोलीस व मुंबईविषयी घेतलेल्या भूमिकेवर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाष्य केलं असून आजपासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात उपऱ्या व्यक्तीविरोधात सभागृहात पक्षभेद मोडून आवाज उठवा असं आवाहन केलं आहे.

- Advertisement -

“विरोधी पक्षांकडून सुशांतसिंह राजपूत, कंगना राणावत अशा ‘राष्ट्रीय हितांच्या’ विषयांवर प्रश्न उपस्थित केले जातील. खरे तर ‘मुंबई’ म्हणजे पाकव्याप्त कश्मीर वगैरे विधान करून समस्त मराठी जनांचा, मुंबईसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचा अपमान करणाऱ्या उपऱ्या व्यक्तीविरोधात सभागृहात पक्षभेद मोडून आवाज उठायलाच हवा आणि त्यात विरोधी पक्षनेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा. महाराष्ट्र जितका शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा आहे, तितकाच तो भाजपचाही असायलाच हवा. महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचा अपमान ही मंडळी कसा काय सहन करू शकतात? मुंबईत खाऊन, ‘पिऊन’ तरारलेली एक महिला फिल्मी कलावंत मराठी अस्मितेवर दारूच्या गुळण्या टाकते हे सहन करता येणार नाही आणि राज्याच्या विधिमंडळात या प्रकाराची निंदा करायलाच हवी. मुंबईचा व पोलिसांचा अवमान करणाऱया त्या ‘मेंटल’ महिलेस महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही असे राज्याचे गृहमंत्री ठणकावून सांगत असतील तर तीच महाराष्ट्राची लोकभावना आहे हे मान्य करावे लागेल. गृहमंत्री देशमुख, मुंबईचे पोलीस आयुक्त व संपूर्ण पोलीस दलावर विधानसभेने विश्वास व्यक्त करणे गरजेचे आहे. मुंबई पोलीस ‘माफिया’ आहेत असे विधान करणाऱ्यांचीच चौकशी व्हायला हवी,” असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

“उत्तर प्रदेशातील मोस्ट वॉन्टेड आरोपी ‘आशु’ यास शनिवारी मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हापूर, नोएडा येथे या माफियाने अनेक खून केले आहेत. याआधी कानपुरात पोलिसाची हत्या करून मुंबईत घुसलेल्या विकास दुबेच्या साथीदारांनाही मुंबई पोलिसांनीच बेड्या ठोकल्या. मुंबई शहर हे देशातील गुन्हेगारांचे ‘डम्पिंग ग्राऊंड’ होत असेल तर त्यास ती ती राज्ये जबाबदार आहेत. तुम्ही घाण करायची व मुंबई पोलिसांनी साफ करायची, हे थांबवायचे असेल तर मुळांनाच हात घालावा लागेल,” असा सल्ला अग्रलेखातून देण्यात आला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -